ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू तालुक्यात ग्रामीण भागात वेळेत बसेस सोडाव्या

डॉ.अभ्युदय मेघे यांनी केली मागणी ; सेलू आगार प्रमुखाशी केलीत चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील रिधोरा,रायपुर, सालई कला, गरमसुर,सालाई पेवठ, नानबर्डी, वानविरा, येथील अनेक विद्यार्थ्यांना विद्यार्थी सेलू गावात महाविद्यालय करिता रोज बसने प्रवास करतात. परंतु त्यांचा आणि बसेस वेळेत येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशातच अनेकदा बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी नियमित महाविद्यालयात जाऊ शकत नाही.यामुळे अनेकदा त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

हीच बाब लक्षात घेत डॉ.अभ्युदय मेघे यांनी सेलू बस स्थानक गाठले व आगार प्रमुखाशी चर्चा करून वेळेत बस सोडण्याचे विनंती यावेळी त्यांनी केली. तसेच या भागात ज्यादाच्या बस सोडण्यात याव्या.अशी विनंती केली. लवकरात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी आगरप्रमुखांनी मेघे यांना दिले.

विद्यार्थ्यांनी मिळाला धीर

हा प्रश्न मार्गी लागतपर्यंत या विषयाचा वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे देखील यावे मेघे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने विद्यार्थी अनेकदा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. परंतु हा विषय मार्गी लावण्यासाठी मेघे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांनी यांच्या आभार देखील मानले.

यावेळी त्यांच्यासोबत शुभम लुंगे, हरीश परिसे, सुशांत वानखेडे, मंगेश वानखेडे, निवृत्ती घुमे,विनीत माहुरे, मनीष पाटील, विक्रांत उईके,पंकज वानखेडे,दीपक तेलरांधे, विलास वांदिले,सत्यवान वंदिले, व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये