रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तपासणी
रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची १६ जुलै ला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करत आढावा घेतला.
मध्य रेल्वे नागपूर मंडळ चे प्रबंधक मनिष अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्मिक अधिकारी श्रीमती सांझी जैन यांच्या नेतृत्वात सहायक कार्मिक अधिकारी एस.एम. बोरकर यांनी कल्याण निरीक्षक, अभियांत्रिकी (कार्य) निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरपीएफ निरीक्षक आणि विद्युत विभागाचे सी.एस. अभियंता यांच्या सोबत स्वच्छता, दुरुस्ती व देखभाल व पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. रेल्वे वसाहतींची दर ३ महिन्यांनी तपासणी केली जाते, हे विशेष. ज्यामध्ये वसाहतीतील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुरुस्तीची कामे आणि नवीन क्वार्टर ची गरज पाहिली जाते. तपासणीसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. आणि मागील तपासणीनंतर केलेल्या कामाचा आढावा घेतला जातो.
तपासणी पथकात सहाय्यक विभागीय कार्मिक अधिकारी एस. एम.बोरकर, सहायक विभागीय अभियंता सुबोध कुमार, कल्याण निरीक्षक एच.एल. देशमुख, आरोग्य निरीक्षक हितेश दावंडे, आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यांनी पाठक, सीआरएमएस चे प्रतिनिधी राकेश आर्य, एनआरएमयूचे प्रतिनिधी युवराज बारंगे उपस्थित होते. या पथकात मध्ये विद्युत विभागाचे मुख्य अभियंता योगेश बाविस्कर, अभियांत्रिकी शाखेचे जे. ई. प्रांशु गुप्ता, जे. ई. विलास मेश्राम यांनी रेल्वे कॉलनीतील क्वार्टर चे पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यातील काही समस्या तातडीने सोडवण्यात आल्या असून उर्वरित तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.