ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आसोलामेंढा येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

पुनर्वसन होत असल्याने या गावातील समस्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष नागरिकांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

     सावली तालुक्यातील गट ग्रामपंचायत अंतरगाव अंतर्गत असलेल्या आसोला मेंढा येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असून तसेच विविध समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आसोलामेंढा या गावातील नागरिकांसाठी पाणी मुबलक मिळावे याकरिता नळ व हातपंपाची सोय केलेली आहे परंतु येथील हातपंप मागील कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत आहे तसेच नळालाही मुबलक पाणी येत नसल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे मुख्य म्हणजे येथील महिला वर्गांचे शेतीचे कामे चालू झाले असल्याने बरेचशे कामे पाण्या अभावी रखडून राहत असल्याने त्यांना आपल्या कामावर उशिरा जावे लागतात त्यामुळे महिला वर्गांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच इथे एक लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट सुद्धा मोठ्या थाटामाटात उभे केले परंतु त्याचीही एक ते दीड वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने आता ती शोभेची वस्तू बनलेली पहावयास मिळत आहे तसेच पावसाळ्यापूर्वीच नालीसफाई चे कामे केले नसल्याने पहिल्याच पावसात नाल्यातील पाणी भरून घरात शिरलेले आहे नाली सफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या समस्याची तक्रार ग्रामपंचायत कडे नागरिक वारंवार करीत असून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आसोलामेंढा हे गाव आसोला तलावाला लागून असल्याने या गावचे पुनर्वसन होणार या हेतूने नागरिकांच्या मूलभूत सुख सुविधाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील नागरिक करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये