ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दगडवाडी फाट्याजवळ भरधाव सकार्पिओ उलटली 

चार ठार, पाच जण गंभीर जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा – चिखली राष्ट्रीय महामार्गांवर दगडवाडी फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या सकार्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने सकार्पिओ उलटल्याने या अपघात तीन जण जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.17 एप्रिल रोजी मंगळवारी सायंकाळी 6:05 वाजता दरम्यान घडली.

या घटनेच्या प्राप्त माहितीनुसार खैरव अंबाशी (तालुका चिखली) वरून जालना येथे लग्न सोहळ्यासाठी जात असतांना दगडवाडी फाट्यानजिक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला या अपघातात विलास जयवंतराव देशमुख वय 63 अशोक भीमराव नयाके वय 65 वसंत देविदास देशमुख. वय 43 रा.अमानी वाशीम या तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चालक योगेश लक्ष्मण देशमुख वय 38 यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जालना येथे तात्काळ हलविण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला. जखमी मध्ये मिरा संजय देशमुख,शालिनी अनंता देशमुख,अक्षदा संदीप देशमुख,गोपाळ देशमुख,गजानन आसाराम तौर यांच्यावर देऊळगांव राजा ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरु आहे. या अपघाताच्या घटनेची माहिती देऊळगांव राजा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णलयात दाखल केले.

घटनास्थळी व रुग्णालयात एकच आक्रोश होता. सदर गंभीर जखमीवर डॉ. प्रिती दिवाकर व डॉ. अक्षय गुटठे,आधीपारिका यांनी तात्काळ उपचार सुरु केले. सदर घटनास्थळी अपघाताचे वास्तव पाहुन अनेकांचे काळजाचे ठोके वाढत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये