ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणूक साक्षरता लोकशाहीची खरी गरज – डॉ. संजय गोरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

निवडणूक साक्षरता ही आज काळाची गरज बनली आहे. निवडणूक साक्षरता म्हणजे लोकशाही बाबत सजग राहून लोकशाहीने दिलेला अधिकार आणि निवडणुकीबाबतची आपली भूमिका पार पाडणे होय नव मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय गोरे यांनी केले आहे

         गडचांदुर येथील शरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे वतीने नव मतदार विद्यार्थ्यांसाठी निवडणूक साक्षरता आणि मतदान कार्ड वितरण हा कार्यक्रमआयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी सचिन मालवी, डॉ. हेमचंद्र दूधगवळी, प्रा. मंगेश करंबे प्रा. डॉ .सत्तेंद्रसिंह व आयोजक रा सेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर उपस्थित होते.

          प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोकर यांनी निवडणूक साक्षरते बाबत व कार्यक्रमाचे आयोजनाबाबत आपली भूमिका विशद करून विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षरता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सचिन मालवी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून निवडणूक साक्षरता आणि मतदानाचे महत्त्व राजकीय व्यवस्थेमध्ये मतदारांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बेलोरकर यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांना मतदान कार्ड वितरित करण्यात आले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये