राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे रक्षा बंधन दिनानिमित्त “इको फ्रेंडली रक्षाबंधन स्पर्धा”चे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या बॉटनी क्लबच्या वतीने विज्ञान विभागातील विद्यार्थांनी पर्यावरणास अनुकूल अश्या विविध प्रकारची राखी तयार केले.या राखीचे वैशिषट्य अशे की या राखी बनवताना त्यात कोणत्याही प्रकारची प्लास्टिक किंवा रसायनाचा वापर केला नाही.नैसर्गिक व टाकाऊ वस्तू पासून त्या बनवण्यात आल्या. या स्पर्धेत 25विद्यार्थांनी सहभाग घेतला.
त्यात कु.पल्लवी राऊत ( B. Sc. Final year) हिने प्रथम , कु. दिप्ती भोयर( B. Sc. Final year) हिने द्वितीय व कु.साक्षी शेंडे( B.sc.second year) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.ही स्पर्धा अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परीक्षण डॉ.राजश्री मार्कंडेवार व प्राध्यापक प्रकाश घागरगुंडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक देवीलाल वाताखेरे यांनी केले. व संचालन प्रा. स्मिता राऊत. तर आभार डॉ.सचिन चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आशिष कोवासे यांची मदत लाभली.कार्यक्रमाला डॉ रामचंद्र वासेकर, डॉ.किरण बोरकर.डॉ.रागिणी पाटील. प्रा.सचिन वाकडे,उपस्थित होते.