अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहत राहायचं का?
जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यीनींने केला मुख्यमंत्र्यांना पत्रातून सवाल ; विद्यार्थ्यीनींच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देऊन पत्र लिहून घेणं, त्यांच्यासोबत सेल्फी करून पाठविणे तसेच स्वच्छता माॅनिटर असे उपक्रम राबविले जात आहेत.त्याच पाश्र्वभूमीवर विविध विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्रा संदर्भात हे पत्र आवडलं का या विषयावर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेण्यात येत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या पत्रावरच खेड्यांतील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील मुलींने सगळं अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहत राहायचं का असा पत्र पाठवून थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल केल्याचा पत्र व्हायरल झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) हि दोन शिक्षकी शाळा आहे.शिक्षण विभागातील छोट्या मोठ्या उपक्रमात सहभागी होऊन नेहमी चर्चेत राहणाऱ्या या शाळेतील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलींने मुख्यमंत्र्यांना केलेल्या सवालाचा सर्वत्र कौतुक होत असून सरकारने या पत्रावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.याबाबत जिल्हा परिषद शाळा गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यात त्यांनी सांगितले की शासनाने विद्यार्थ्यांवरील पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी नविन अभ्यासक्रम काढले मात्र हे अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमांपेक्षाही त्रासदायक असल्याचे सांगितले.
शाळेत गुरूजींने शिकवलेल्या मागिल पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यासाठी प्रत्येक पुस्तक चाळावे लागतं अन् जुनं पुस्तकच बरं होतं जुन्या अभ्यासक्रमांपेक्षाही जास्त ओझं या नविन पाठ्यपुस्तकाच आहे त्यामुळे मला नविन अभ्यासक्रम आवडला नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याचे विध्यार्थींनिने सांगितले.
– काय केलंय मुख्यमंत्र्यांना मुलींने सवाल
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही.कारण आता एका विषयासाठी चार-चार पुस्तक शोधावी लागतात.यापेक्षा आमचं जुनं पुस्तकच छान होतं.कारण सगळं गणित एका पुस्तकात, इंग्रजी एका पुस्तकात, विज्ञान एका पुस्तकात असायचं त्यामुळे एकाच विषयाच पुस्तक वाचायला मज्जा यायची मात्र नविन अभ्यासक्रमांचा अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहत राहायचं का असा थेट सवाल या मुलींने मुख्यमंत्र्यांना पत्रातून केला आहे.