महात्मा गांधी विद्यालयात 10 विच्या विद्यार्थ्यांना निरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे एस. एस. सी. परीक्षा मार्च -2024 ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 26 फेब्रुवारीला निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे मॅडम होत्या, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकरराव तुराणकर तसेच दहावीचे सर्व वर्गशिक्षक आणि विषय शिक्षक उपस्थिती होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
प्रमुख अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.समृद्धी पाटील “९”-ब या विद्यार्थिनीने केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष चिताडे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना परीक्षेला समोर जातांना कुठलीही भीती न बाळगता व गैरमार्गाचा अवलंब न करता परीक्षा द्यावी असे संबोधन केले, प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक श्री. काकडे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच इय्यता 10 च्या विद्यार्थी कु.अनुष्का दुबे,कु.गौरी पेंदोर,निल गेडाम,प्रणय राठोड,यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले,इय्यता 9 वि च्या विद्यार्थ्यांनी 10 च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन कुमारी गौरी शिंदे वर्ग 9 वा ग आणि सानिया भोयर वर्ग 9 वा इ या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन ओम मरापे वर्ग 9 वा अ च्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववी चे सर्व विद्यार्थी व वर्गशिक्षक रविंद्र चौधरी, देवराव जाधव, वामन टेकाम अमोल शेळके, माधुरी मस्की कु. श्वेतलना टिपले, कु.वैशाली महतकर , यांच्याकडून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी सहकार्य केले.