३६५ दिवस चालणारी शाळा पालडोह अव्वल
बिटस्तरीय नवरत्न स्पर्धेत यशाची कामगिरी कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह जी ३६५ दिवस चालणारी नाविन्यपूर्ण शाळा आहे. या शाळेने झालेल्या बितस्तरीय नवरत्न स्पर्धेत प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात मुलांनी चांगली कामगिरी करत प्रथम १० पारितोषिक व द्वितीय ३ पारितोषिक मिळवत एकूण १३ बक्षिसे मिळवत शाळेची कामगिरी कायम ठेवली. ◆ प्राथमिक गटात एकपत्री अभिनय व स्वयंस्फुर्त भाषण या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु योगिनी माने वर्ग ४ था, गौरव गुर्जेवाड वर्ग ५ वा याने चित्रकला स्पर्धा व स्मरणशक्ती स्पर्धा यात पहिला क्रमांक पटकावला, कु नकुशा पवार वर्ग ४ था हिने स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, वैभव केसगीर वर्ग ५ वा याने सुंदर हस्ताक्षर या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
प्राथमिक गटात असे एकूण ६ प्रथम क्रमांक व बुद्धिमान स्पर्धेत अर्जुन राठोड वर्ग ५ वा याने द्वितीय क्रमांक पटकावत एकूण ७ बक्षिसे मिळवत प्राथमिक गटात पालडोह या शाळेने वर्चस्व प्रस्थापित केले. ◆ उच्च प्राथमिक गट प्राथमिक गटाप्रमाणे उच्च प्राथमिक गटात सुद्धा शाळेतील मुलांनी चांगली कामगिरी करत एकपत्री अभिनय स्पर्धेत कु दिव्यांका बाजगिर वर्ग ८ वा हिने प्रथम क्रमांक पटकावला, स्मरणशक्ती स्पर्धेत गोपाल राठोड वर्ग ७ वा याने प्रथम क्रमांक पटकावला, चित्रकला स्पर्धेत कु प्रवलीका नांदूरे वर्ग ७ वा हिने प्रथम क्रमांक पटकावला, कु प्रतीक्षा आईतवाड वर्ग ७ वा हिने प्रथम क्रमांक पटकावला,असे एकूण ४ प्रथम क्रमांक पटकावत याच गटात विवेक चव्हाण वर्ग ८ वा बुद्धिमापन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला,स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धेत कु संचिता चव्हाण वर्ग ८ वा हिने द्वितीय क्रमांक पटकावला.आशा पद्धतीने प्रथम क्रमांक ४ व द्वितीय क्रमांक २ असे पटकावत उच्च प्राथमिक गटात सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह ने प्राथमिक गटाय व उच्च प्राथमिक गटात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या वेळी शाळेचे शिक्षक व मार्गदर्शक पानघाटे,रत्नमाळ, वेलादी, शेख व शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शक परतेकी सर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्या. मुलांनी मिळवलेल्या बक्षीसामुळे पालकामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले.पालकांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्या.