विवेकानंद विद्यालय भद्रावती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर टाकला विद्यार्थ्यांनी प्रकाश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय लांबट आणि प्रमुख अतिथी कल्पना ठावरी व मेघा ताजने ही मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी शिक्षक गण आशा मते, दयाकर मग्गीडवार, तुकाराम पोफळे, पुरुषोत्तम श्रीरामे, संजय आगलावे यांनी सुध्दा प्रतिमा पूजन केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करताना विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रतीक्षा झिंगरे, पूर्वी पाल, लक्ष्मी रंदये, पूनम खंडाळकर, शाहीन पठाण, वैष्णवी भोई, दिव्या भोई आदींनी आपापल्या भाषणांतून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्र व कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय लांबट म्हणाले की,
‘भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला आहे.
त्या सर्व महान लोकांचे जीवन चरित्र व कार्य समाजासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा थोर पुरुषांमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची नावे अग्रक्रमाने घ्यावे लागतील.’
‘प्रचंड बुद्धिमत्ता, तल्लख स्मरणशक्ती, नीटनेटकेपणा व वाचन अशा अनेक गुणांसह स्वामी विवेकानंद यांनी भारताबाहेर भारत देशाचे नाव उज्वल केले.’ असेही ते म्हणाले.
प्रमुख अतिथी कल्पना ठावरी व मेघा ताजने यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आस्था बारतीने आणि आभार प्रदर्शन कु. अनुष्का लोडे या विद्यार्थिनींनी केले.
विनोद गावंडे, बंडू कांबळे, विश्वनाथ हरबडे यांनी सुध्दा या प्रसंगी आपली उपस्थिती दर्शविली.