ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनआक्रोश महाआंदोलनाच्या प्रसिद्धीसाठी अमरावतीत बैठक

सकल मातंग समाजाच्या वतीने २० मेला महाआंदोलन

चांदा ब्लास्ट

अमरावती येथे नुकतीच सकल मातंग समाजाची सभा पार पडली.त्यासाठी स्थानिक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. सभेला जिल्हाभरातून समाज बांधव आलेले होते तर राज्याच्या सर्वच विभागातून राज्य समन्वयक उपस्थित होते. १ ऑगस्ट २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारने आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २० मे २०२५ ला आझाद मैदान मुंबई येथे जनआक्रोश महाआंदोलन आयोजित केलेले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी बैठक आयोजित केलेली होती.बैठकीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून २० मे च्या आंदोलनासाठी समाज बांधव उत्साही असल्याचे दिसून आले.सदर सभेच्या अध्यक्षस्थानी एस एस धुपे उपस्थित होते.

तर मार्गदर्शक म्हणून माजी आमदार नामदेव ससाणे,अशोक लोखंडे, मारोती वाडेकर,डॉ.अंकुश गोतावळे,सौ.ससाणे, सौं लोखंडे, कैलास डाखोरे हे राज्यसमन्वयक उपस्थित होते. यावेळी स्थानिक समाज बांधव यांनीही जनआक्रोश आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनेक सूचना केल्या आणि २० मे आंदोलनाला मुंबईत येणार असा संकल्प केला. राज्यभरातून सुरु असलेली तयारी पाहता जनआक्रोश आंदोलन हे निर्णायक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी देवीलाल अवचार,रवी वानखेडे,नामदेव झोंबाडे, डॉ रुपेश खडसे,पंकज जाधव,गौरव गवळी,गायकवाड,भैसने,खडसे, खंडारे यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये