ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा संसद भवनावर सर्वांसाठी शेतीच्या धोरणाबाबत महलक्ष्यवेधी मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित राषट्रपती यांना पाठविले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

केंद्र सरकारने यापूर्वी सर्वांसाठी घरे -2 024चे धोरण घोषित केले आता सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करण्याची नरेंद्र मोदी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

वर्धा जिल्ह्यातील पाच हजार बिगर सातबारा शेतकरी महिला पुरुष सहभागी होणार असल्याचा निवेदनातून इशारा

वर्धा – दलीत आदिवासीं भूमिहीन बेघर ओबीसी, गरीब मराठा समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनी मशागत करून त्यावर जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा चरितार्थ चालवितआहेत परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी धनशक्ती – बाहूशक्ती – राजकीय शक्तीच्या बळावर गैरवापर करून शासनाच्या शेकडो यकर जमिनी हडप केल्याच्या मा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनात आल्यामुळे मा सर्वोच्च न्यायालयाने सन 2011 साली गायरान जमिनी इतर करण्याकरिता वापरावर निर्बंध टाकले आहेत त्याच धर्तीवर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की गावातल्या राखीव जमिनी फक्त केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पाकरिता उपलब्ध करून द्याव्यात इतर कोणत्याही व्यक्ती, संस्था, यांच्या प्रकल्पाकरिता वापरात आणू नये असे स्पष्ट आदेश असताना संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा केल्या मुळे केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे -2022 चे धोरण घोषित केले त्याची अंमलबजावणी तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडलाने केल्यामुळे ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्याच धर्तीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकुल करावा या मागणीसाठी 30 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथील संसद भवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली असून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्म यांच्या कडे निवेदाद्वारे माहिती पाठविली असून वर्धा जिल्ह्यातून पाच हजार महिला पुरुष सहभागी होणार असल्याची माहिती सांगितली यावेळी श्यामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्ष सौ इंदिरा बोंदरे यांनी अनुसूचित जमातीपैकी कोलाम समाजाविषयी तर फासे पारधी समाजाविषी समशेरसिंग भोसले फासे पारधी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पवार यांनी होत असलेल्या अन्याय बाबत सविस्तर माहिती सांगितली आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटना संलग्न श्यामादादा कोलाम ब्रिगेड व समशरसिंग भोसले फासे पारधी समाज संघटना आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा करणार असून होऊ घातलेल्या 30जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथील संसद भवनावर मोर्च्यात कोलाम समाज व फासे पारधी समाज हजारोच्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती विलास पवार व सौ इंदिरा बोंदरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली यावेळी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ रेखा कैलास खंदारे मेळघाट संपर्कप्रमुख लक्ष्मण बेलकर उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये