भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान करावे – जितेंद्र गाडेकर-जेष्ठ पत्रकार.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
आज होणाऱ्या मतदानासाठी मतदारांनी आपल्या मताचा उपयोग देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी करावा.
लोकशाहीत मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली,आपण ती अजूनही टिकवून ठेवली आहे.लोकशाही मुळे अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला मिळालेले आहेत.
मतदानातून आपणाला लोकशाही बळकट करण्याची संधी मिळते. आजच्या परिस्थिती मध्ये देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी,
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे,जालना जिल्हा अध्यक्ष,जितेंद्र गाडेकर यांनी जनतेला आवाहन केले.