प्राचीन संस्कृती टिकविण्यासाठी संस्कृत आत्मसात करावीच लागेल
प्राचार्य डॉ.राजू ताटेवार यांचे प्रतिपादन.
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर
संस्कृत भारती, विद्याभारती आणि श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. सत्यसाई सेवा समिती चंद्रपूर येथे दि. २५ जुलै ते ०५ ऑगस्ट पर्यंत संस्कृत सम्भाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
त्याच्या समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.राजू ताटेवार, प्रमुख अतिथी श्री सत्यसाई सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. चन्द्रशेखरजी मुनगंटीवार आणि चंद्रपूर संस्कृतभारती अध्यक्ष अॅड. रशीदजी शेख उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. मुनगंटीवार यांनी चालु असलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि अशा कार्याकरीता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. ताटेवार म्हणाले की आपले सर्व प्राचीन ज्ञान विज्ञान साहित्य हे संस्कृत भाषेत आहे ते अगाध ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृत भाषा अवगत करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे संचालन वर्गशिक्षिका प्रा. प्रणीता भाकरे यांनी केले. तर मनोगत कथन तथा ऋणनिर्देशन विद्याभारती चंद्रपूर जिल्हा मंत्री श्री. सुभाषजी त्रिपाठी यांनी केले. वर्गाच्या
यशस्वीततेकरीता मैत्रेयी छात्रावास स्नेहनगरच्या सर्व विद्यार्थीनी, अंजलीताई हिरुरकर, पद्माताई पेद्विवार, चि. कृष्णकुमार त्रिपाठी, श्रीपादजी मिश्रा, सुमितजी शुक्ल, अर्चनाताई गोंधळेकर आणि संस्कृत भारतीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.