Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालडोह शाळेने बांधला वनराई बंधारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पालडोह तालुक्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा पालडोह मागील दहा वर्षांपासून दिवाळीच्या मुहूर्तावर गावालगत असलेल्या ओढ्यावर वनराई बंधारा या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून तयार केला.

    या बंधाऱ्यामुळे गावातील जनावरांना व गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी या बंधाऱ्याचा खूप फायदा होणार आहे. हा बंधारा तयार करत असताना शाळेचे शिक्षक पानघाटे, रत्नमाळ,वेलादी,शेख व शाळेचे मुख्याध्यापक परतेकी यांनी शाळेतील १४८ विद्यार्थी मिळून हा वनराई बंधारा तयार केला. दिवाळीच्या पर्वावर एक चांगला संदेश देत पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश या सर्व शाळेने दिला आहे. या दिवाळीत असे बंधारे तयार करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे असे एक उदाहरण समाजासमोर गेली दहा वर्षांपासून ठेवत जिल्हा परिषद पालडोह आपले एक सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे.सोबतच फटाके मुक्त दिवाळी हा संकल्प घेत प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प या शाळेतील मुलांनी घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये