ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्हारशाह-वर्धा विशेष डेमू ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करवून घेत प्रवाशांना दिलासा

रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे हंसराज अहीर यांचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील प्रवासी, नोकरदार व रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेवून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अखेर ट्रेन क्र. 01316 बल्हारशाह-वर्धा या विशेष डेमू ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा दिला आहे.

सदर ट्रेन ही यापूर्वी बल्हारशाह स्थानकातून सायंकाळी 05.00 वा सोडण्यात येत होती. त्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी विशेषतः शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही ट्रेन असुविधाकारक ठरत असल्याने झेडआरयुसीसी चे सदस्य दामोदर मंत्री व रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेकडे ही अडचण व्यक्त केली होती. या अडचणीची दखल घेवून अहीर यांनी या डेमू ट्रेनची वेळ बदलण्याकरीता केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन यांचेशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करुन या ट्रेनची वेळ बदलवून बल्हारशाह-वर्धा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध केली आहे. आता ही डेमू ट्रेन बल्हारशाह वरुन सायंकाळी 06.30 वा. सुटून चंद्रपूर येथे 06.53 वा. पोहचेल व ही ट्रेन वर्धेला रात्रो 09.30 वा. पोहचणार आहे. या बदलामुळे नोकरपेशा लोकांना चांगली सुविधा झाली असून त्यांना कार्यालयाची वेळ सांभाळून यामुळे सोयीचा प्रवास करण्याची संधी मिळाली आहे.

डेमू ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना सुविधा उपलब्ध केल्याबद्दल रेलसुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री रमणीकभाई चव्हाण, दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, शाम सारडा, डॉ भूपेश भलमे, पूनम तिवारी, प्रदिप माहेश्वरी, अनिश दिक्षित, अशोक रोहरा, राजेश सादरानी, नरेश लेखवानी, संजय मंघानी, प्रमोद त्रिवेदी, सुदाम यादव, महावीर मंत्री, रमेश बोथरा, शकरसिंह राजपूरोहीत, प्रभाकर मंत्री, प्रल्हाद शर्मा, विनोद बजाज, मिलिंद दाभेरे, गौतम यादव यांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून अभिनंदन केले. जिल्ह्यातील अन्य महत्वपूर्ण रेल्वे विषयक समस्या व आवश्यक असलेल्या ट्रेन सुरु करण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. सदर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतांना हंसराज अहीर यांनी मुंबई करीता थेट गाडी सुरु करण्यास तसेच अन्य रेल्चे विषयक प्रश्नांबाबत आपण प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यासंदर्भात रेल्वे मंत्री व चेअरमन यांचेसोबत लवकरच बैठक घेत असल्याची माहिती त्यांनी रेल्वे समितीच्या पदधिकाऱ्यांना दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये