ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर घुग्घुसमध्ये ध्वनी प्रदूषणावर बंदीची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर): १२ फेब्रुवारी २०२५ पासून १२वी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून, विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करत आहेत. अशा परिस्थितीत रात्री १० नंतर ध्वनी प्रदूषणाला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी शिवसेना (उबाटा) युवा नेते अमित बोरकर यांनी केली आहे.
त्यांनी सांगितले की, मार्च महिन्यात १०वीची परीक्षा देखील सुरू होणार आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून ध्वनी प्रदूषणावर निर्बंध लावावेत. जोपर्यंत १२वी आणि १०वीच्या परीक्षा संपत नाहीत, तोपर्यंत घुग्घुस परिसरात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.