तिन अट्टल गुन्हेगारांना केले तडीपार – एक वर्षासाठी जिल्ह्यातून झाले हद्दपार
सणासुदीच्या काळात पोलीस अधीक्षकांनी दिला नागरिकांना दिलासा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता यावे ह्यासाठी पोलीस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करित असते. ह्याच कारवाईचा भाग म्हणून जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याच्या बामणी येथिल तिन अट्टल गुन्हेगारांना बल्लारपूर ठाणेदारांच्या प्रस्तावानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सध्या सुरू असलेले गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद तसेच नवरात्र हे सण जनतेने शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे करण्याकरीता पो.स्टे. बल्लारशा परिसरातील अट्टल गुन्हेगार 1) चेतन मनोहर खुटेमाटे वय 43 वर्षे रा. बामणी 2) राकेश लक्ष्मण देरकर वय 32 वर्षे रा. बामणी व 3) किशोर गुलाब मुडपल्लीवार वय 52 वर्षे रा. बामणी या ईसमांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि ते टोळीने गुन्हे करून दहशत माजवतात ह्या कारणांनी पो. नि. उमेश पाटील, प्रभारी ठाणेदार पो.स्टे. बल्लारशा यांनी हद्दपार करण्या बाबत पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला त्या प्रस्तावावर रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी कलम 55 अन्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे म्हणून चंद्रपूर जिल्हयातून 1 वर्षा करीता हद्दपार (तडीपार) केले आहे. या काळात सदर हद्दपार ईसम हे चंद्रपूर जिल्हयात कुठेही वास्तव्य करणार नाही. यापुढे ही अशा प्रकारे गंभीर गुन्हे व दहशत माजविणारे गुंड यांचेवर गंभीर प्रतिबंधक कारवाई चंद्रपूर पोलीस दलामार्फत करण्यात येणार आहे.