ताज्या घडामोडी

भिषण आगीत कापड दुकान भस्मसात – मध्यरात्रीच्या थरारात कोट्यवधींचा ऐवज जळुन खाक

आगीची घटना अपघात की घातपात?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

बल्लारपूर शहराने मध्यरात्री आगीच्या थरार अनुभवला असुन मुख्य शहराच्या हृदयस्थानी असलेल्या वस्ती भागात मागील जवळपास 50 वर्षांपासून सुरू असलेल्या मोतीलाल प्रभुलाल वस्त्र भांडार व मालू साडी सेंटर मधे लागलेल्या भिषण आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरातील प्रसिध्द मोतीलाल प्रभुलाल वस्त्र भांडार व मालू साडी सेंटर मधे मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अचानक भिषण आग लागल्याने खळबळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच दुकानाचे मालक सुरेश व सुनिल मालू ह्यांना माहिती देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

माहिती मिळताच नगर पालिका अग्निशमन विभाग तसेच पेपर मिल व इतर ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. आग इतकी भिषण होती की आगीत नुकत्याच नूतनीकरण करण्यात आलेल्या दुकानातील कापड व इतर साहित्य जळुन खाक झाले असून ह्यात मालू ह्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

अपघात की घातपात

मालू ह्यांच्या दुकानात लागलेली आग हा अपघात आहे की घातपात ह्याबद्दल चर्चेला उधाण आले असुन दुकानाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेल्या स्थितीत आढळुन आले असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे आहे. मागील दिवाळीच्या सुमारास दुकानाच्या तिनही मजल्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. संपुर्ण फर्निचर तयार करण्यात आले तसेच इमारतीतील वायरिंग सुद्धा बदलण्यात आली असल्यामुळे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असण्याची शक्यता कमी असून कुणीतरी मुद्दाम लावली असण्याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीस तपासात आगीचे नेमके कारण स्पष्ट होईलच तुर्तास मात्र शहरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये