विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घ्या
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादित द्वारे विदर्भात प्रीपेड स्मार्ट मीटर दिवाळी नंतर लावण्याकरिता युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. नागरिकांची मागणी नसताना, तसेच गरज नसताना, जनतेला विश्वासात न घेता विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे.
प्रीपेड स्मार्ट मिटर लावणे जनतेवर अन्यायकारक कसे?
विदर्भातील आर्थिक दुर्बल जनतेला विद्युत स्मार्ट मीटर
परवडणारे नाही, वर्तमान परिस्थिती मध्ये वीज वापरल्यानंतर वीज बिल येते व बिल आल्यानंतर विद्युत देयकाचा भरणा करण्याकरिता ४० दिवसाचा कालावधी दिल्या जातो परंतु प्रीपेड स्मार्ट मीटर लावल्यानंतर आधीच रिचार्ज करावा लागेल,
बऱ्याच लोकांकडे स्मार्टफोन नाही, दुर्गम भागात तर स्मार्टफोन काय व रिचार्ज काय हे माहीत नाही,शहरातील झोपडपट्टी भागात रोज काम करणारे हातावर आणून पानावर खाणारे आहे, ग्रामीण व शहरी भागात सुद्धा मोबाईल नेटवर्क ची समस्या जशी च्या तशी आहे, अशा परिस्थितीत रिचार्ज अभावी वीज कपात झाली तर लोकांना विजेअभावी राहावे लागणार, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा खोळंबा होऊन त्याचे शैक्षणिक नुकसान होईल,रात्रीला केव्हाही रिचार्ज संपला तर आपोआप वीज पुरवठा खंडित होऊन लोकांना अंधारात राहावे लागेल,
लोड कमी जास्त झाल्याने तांत्रिक खराबीने प्रिपेड स्मार्ट मिटर नादुरुस्त झाला किंवा जळाला तर त्याची किंमत दुबार द्यावे लागेल व गरीब लोकांना ते परवडणारे नाही,मिटर खराब झाल्यास एव्हरेज बिल मिळणार नाही तर वाढीव वीज बिल मिळेल,विद्युत वीज प्रिपेड मिटर बाबत जनतेच्या मनात वरील प्रश्न निर्माण झाल्यामुळे या योजनेबाबत विदर्भातील जनतेमध्ये रोष निर्माण झाला असून जनता विद्युत प्रिपेड मिटरचा योजनेला विरोध करत आहे, विद्युत स्मार्ट मिटर करण्यात येऊ नये,अशी नागरिकांची मागणी आहे.
जेव्हा की विदर्भात महाराष्ट्राच्या ७०% टक्के वीज निर्मिती होते,त्या करिता जमीन, पाणी, कोळसा ही संपत्ती विदर्भाची लागली वरून प्रदूषणाने होणारे जीव घेणारे दुर्धर आजार यालाही विदर्भाच्याच जनतेला सामना करावा लागतो,त्यामुळे जणभावनांचा रोष लक्षात घेऊन विद्युत प्रिपेड स्मार्ट मिटर लावण्याचा तुगलकी निर्णयास जय विदर्भ पार्टीचा तीव्र निषेध आहे, त्यामुळे जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन विद्युत प्रिपेड स्मार्ट मिटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा,अन्यथा जय विदर्भ पार्टी रस्त्यावर येऊन जनतेच्या हक्काकारिता प्रिपेड स्मार्ट मिटर लावू देणार नाही, अश्या मागणीचे जय विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड यांनी जिवती तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यावेळी उपस्थित विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड, सामाजिक कार्यकर्ते विजय गोतावळे,अनिल कोवे, मगरद्वाज देवकते,श्रीरंग कोळेकर, अमृत चाहकाटे, रामदास पवार, संतोष जाधव, भीमराव मेश्राम, संजय मुंडे व नागरिक उपस्थित होते.