थोर क्रांतिकारक आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : अबुआ दिशूम अबुवा राज ( हमारा देश हमारा राज) चा नारा देणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणारे धरती पकड भगवान बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे.
त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालच्या आदिवासी समाज बांधवासाठी आपल्या प्राणाची बली दिली.
वयाच्या चौविसाव्या वर्षी शहीद होणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी यानिमित्त काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र आदरांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, दिपक पेंदोर, सुनील पाटील, दिपक कांबळे, मनोज चांदेकर, शहंशाह शेख,निखिल पुनघंटी, आयुष आवळे, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते