दहावी परीक्षेत फेरीलँड स्कुलचा शंभर टक्के निकाल
आरुशी निखाडे 91.40, श्रेया श्रीकांत गोंड 88.60 तर शृती भास्कर काकडे 86.80 टक्क्यांनी उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दहावी स्टेट बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन. या निकालात शहरातील फेरीलँड शाळेने घवघवीत यश संपादन करीत आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असुन सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना 75 टक्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहे.
सदर निकालात शाळेतील मुलींनीच बाजी मारली असुन पहिल्या तिन क्रमांकामधे मुलीच आलेल्या आहे.शाळेच्या आरुशी चंद्रकांत निखाडे हिने 91.40टक्के गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम,श्रेया श्रीकांत गोंड हिने 88.60 टक्के गुण प्राप्त करीत दुसरे तर शृती भास्कर काकडे हिने 86.80 गुण प्राप्त करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष अड.युवराज धानोरकर व प्राचार्य वर्षा धानोरकर यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.