ग्रामपंचायत कार्यालय खरांगणा गोडे बंद असल्यामुळे सरपंच/सचिव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी
युवा परिवर्तन की आवाज संघटनेमार्फत निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. २८/८/२०२३ वार सोमवार ला युवा परिवर्तन की आवाज संघटनेमार्फत निवेदन देण्यासाठी आले असताच सोमवार, हा हप्ता चा पहिला दिवस असून सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच / सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी कोणीही हजर होते नाही व कार्यालय पूर्ण पणे चक बंद होते.
तसेच मागील हप्ता मध्ये फक्त एक दिवस चालू होते, जर एक हप्तातून एक दिवस ग्रामपंचायत कार्यालय खुलत असेल तर नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत तर कुठे असा प्रश्न चिन्ह? आला आहे, जर वारवार ग्रामपंचायत मध्ये येऊन पण गावातील ग्रामपंचायत बंद राहते असे नागरिकांचे म्हणणे आहे, त्यामुळे आज आम्ही सचिव ज्योती राऊत यांना फोन केला तर आमचा नंबर ब्लॉक केल्याचे दिसून आले, त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कुमुदबाई गोडे सचिव ज्योती राऊत व यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी. साहेब, वर्धा यांचेकडे सादर केले आहे.
युवा परिवर्तन की आवाज, वर्धा