रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक मेश्राम यांच्या मृत्यूने रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही!
"रिपाइं (ए) वर्धा जिल्हा व विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांची शोक संवेदना"!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जेष्ठ नेते म्हणुन अशोक भाऊ मेश्राम सर्वाना परिचित होते.त्यांनी पँथर चळवळीत कार्य केले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मध्ये आंबेडकरी व बहुजन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय कार्य करत ते जिवन जगले.दिवंगत अशोक भाऊ यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते.कुशल व प्रगल्भ कार्यकर्ता म्हणून ते शोषित,पिडीत व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शासणा विरोधात बंड करणारे रिपाइं नेते होते.
मात्र त्यांचे हृदयविकाराने मृत्यु झाल्याने तीव्र दुःख होत आहे.त्यांच्या मृत्यू ने रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही;अशी शोक संवेदना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी व्यक्त करून त्यांच्या पत्नी सविताताई (घोडे) मेश्राम, मुलगी बेनझीर यांचे सात्वंत केले.