ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत बीएसएनएलची सेवा ठप्प!

जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन सेवा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील प्रत्येक विभागात ऑनलाईन कामे केली जात असली तरी मागील आठ दिवसापासून तहसिल व पंचायत समिती कार्यालयात बिएसएनएलची नेटवर्क सेवा ठप्प झाल्याने शासकीय कामे खोळंबली असून याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे.एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देवून बिएसएनएलची नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

              राज्यात व देशात सर्वत्र ऑनलाईनचे जाळे पसरले आहे.कुठलेही काम आता ऑनलाईन शिवाय होत नाही.त्यासाठी दररोज त्या कार्यालयात नेटवर्कची सेवा सुरळीत असणे गरजेचे आहे. मात्र ग्रामीण भागात हे अपवाद आहे.महिनाभरात कित्येक वेळा नेटवर्क अभावी नागरिकांना हताश होऊन परतावे लागते. आता तर आठ दिवसापासून हि बिएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने तहसिल कार्यालय व पंचायत समितीमध्ये कामासंदर्भात आलेल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.जिवती येथे बीएसएनएलचे तालुकास्तरीय छोटे कार्यालय आहे. मात्र हे कार्यालय फक्त नावालाच आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची या कार्यालयात नेमणूक केलेली नाही.त्यामुळे वारंवार नेटवर्क सेवा खंडीत होते.याबाबत अनेक वेळा शासकीय कार्यालयातील कर्मचारी बीएसएनएलकडे तक्रार करतात मात्र याची वेळीच दखल घेतली जात नाही.आठ दिवसापासून खंडीत झालेली तहसिल कार्यालयातील व पंचायत समितीची नेटवर्क सेवा तातडीने सुरू करावी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याची मागणी केली जात आहे.

◆ जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे

बीएसएनएलचे कोणत्याही प्रकारचे लक्ष जिवती तालुक्यातील या समस्येकडे नाही. त्यामुळे खासगी नेट कंपन्या यांना जिवती तालुका आंदण दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर तत्काळ जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असून नेटसेवा नसल्याने तहसिल कार्यालयाच्या मार्फत मिळणारा महसूलदेखील बुडत आहे आणि सामान्य नागरिकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये