ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत आणीबाणीच्या काळ्या दिवसांची आठवण व लोकतंत्र सेनानींनाचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ १९७५ मधिल आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक होता. या काळात नागरिकांचे बहुतांश मुलभूत हक्क स्थगित करण्यात आले. २५जुन १९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या घटनेला ५१वर्ष पूर्ण होत आहे.

आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रावर बंधने लादली गेली. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक झाली आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यानंतर गदा आणली. भारतातील संपूर्ण जेल तुडुंब भरल्या गेली. अनेक लोकतंत्र सेनानींना मीसाबंदी या कायद्याअंतर्गत १९ महीने जेल बंदी केल्या गेली. या कालावधीत अनेक लोकतंत्र सेनानी चे कुटुंब अस्ताव्यस्त झाली. १३१ मीसाबदींचा या दरम्यान जेलमध्ये मृत्यू झाला. आणीबाणीच्या काळात देशाच्या आणि संविधानाच्या रक्षणार्थ लोकतंत्र सेनानींनी लाठ्या-काठ्या खाल्या, जेलमध्ये जाऊन अनेक यातना सहन केल्या कारण या देशाची लोकशाही जिवंत ठेवणे आणि संविधानाचे रक्षण करणे हाच त्यांचा डीएनए होता. अशा आणीबाणीच्या काळ्या दिवसाच्या आठवणी प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.रविंद्रजी भुसारी, माजी प्रदेश संघटनमंत्री भाजपा यांनी लोकमान्य टिळक वाचनालय येथे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मीसाबंदी व सत्याग्रही सेनानींचा पुष व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यात श्री.वामनराव भुसारी,यशवंतराव नानोटी,दिलीपराव शिनखेडे,स्व.भास्करराव भुसारी यांचे चिरंजीव ॲड. वसंतराव भुसारी,स्व.पांडुरंगपंत जोशी यांचे चिरंजीव श्रीपादराव जोशी,स्व.बाबुराव लांबे यांचे चिरंजीव प्रा.संजय लांबे,स्व.नामदेवराव सालोटकर यांचे चिरंजीव प्रा. डॉ.अशोक सालोटकर,स्व.वामनराव लांबे यांचे चिरंजीव मुकुंदराव लांबे,स्व.संभाजी दलाल यांचे बंधू प्रकाश दलाल, तसेच कार्यक्रमाचे वक्ते श्री. संजयची गजपुरे माजी जिल्हा महामंत्री यांनी सुद्धा आणीबाणीच्या काळात लोकतंत्र सेनानींना मीसाबंदीच्या काळात जेलमध्ये कशा यातना दिल्या गेल्यात . तसेच आणीबाणीच्या काळात लोकशाही आणि संविधानीक मुल्याच्या रक्षणासाठी संघर्ष करणारे सर्व सेनानींचा त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा, त्यांचा संघर्ष आणि बलीदान भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहिल अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी आणीबाणीचा हा भारताच्या इतिहासातील १९७५-१९७७ या दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता.

या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यानी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. एकप्रकारे लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणूका पुढे ढकलल्या. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी,फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली. रा. स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणल्या गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ननील अलगदिवे यांनी तर प्रास्ताविक व परिचय प्रा .डॉ.शहर अध्यक्ष सुयोग बाळबुधे यांनी तर आभार साकेतजी भानारकर यांनी मानले. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये