ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड नगर परिषद क्षेत्रात दूषित पाणी पुरवठा

अभियंता सांगतो झाडें लावायचे मात्र पाणी पुरवठा होईल आठ दिवसांनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद क्षेत्रात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नगर परिषद मुख्याधिकारी यांना १३जुलै रोजी देण्यात आली.१५दिवस झाले तरी नगर परिषदेने कोणतीही दखल घेतली नाही याउलट पावसाळ्यात गढूळ व अशुद्ध पाणी आरोग्यासाठी हानिकारक असतानाही नगर परिषदेने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही याउलट तेथील नागरिकांनी गढूळ पाणी पिण्यायोग्य नसल्याने जिथे पिण्यास योग्य आहे तिथून आणल्या गेले मात्र अजूनही नगर परिषदेने वार्ड क्रमांक ३नवखळा येथे दूषित पाणी अजूनही दखल घेतली नाही. याबाबत नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी कंकाळ यांचेशी संपर्क होऊ शकला नाही पण पाणी पुरवठा अभियंता उमेश शेंडे यांचेशी संपर्क केला असताना नवंखळा येथील दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे यावर आपण काय उपाय सुरु आहे याबाबत त्यांनी अजून आठ दिवस पाणी अशुद्ध दिले जाईल कारण नगर परिषद क्षेत्रात वृक्ष लागवड सुरु आहे. झाडें महत्वाची कि पाणी यावर त्यांनी होईल तेव्हाच आम्ही सुरु करू असे आमचे प्रतिनिधी यांना दूरध्वनी वरून सांगितले. त्यांना जनतेच्या पिण्याचे पाणी महत्वाचे वाटले नाही मात्र झाडें लावणे महत्वाचे वाटले यावरून जण कल्यानासाठी नगर परिषद किती कार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे.

नागभीड नगर परिषद येथे पाणी पुरवठा अभियंता व पाणी पुरवठा कर्मचारी हे दररोज होणाऱ्या पाणी पुरवठा, देखभाल, दुरुस्ती कडे दुर्लक्ष करीत असल्याने अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास यांचा त्वरित पदभार काढण्यात यावा अशी तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे केली असून यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये