ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मातंग समाजाच्या दवंडी मोर्चाने सरकारला जागे केले

सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

सकल मातंग समाजाच्या वतीने नुकताच लहुतीर्थ संगमवाडी पुणे ते मुंबई असा दवंडी मोर्चा आयोजित केलेला होता.मोर्चा २० तारखेला मुंबई च्या आझाद मैदानावर पोहोचला. त्यानंतर तेथे विराट सभा घेण्यात आली. मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. आणि अनेक रेल्वे रद्द करण्यात आलेल्या होत्या,तसेच उपनगरीय रेल्वे वाहतूक बंद होती.
तरीसुद्धा हजारोंच्या संख्येने समाजबांधव आझाद मैदानावर पोहोचले आणि मोर्चाची दखल सरकारला, तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना घेणे भाग पडले. अनु. जातींचे वर्गीकरण, आर्टीची निर्मिती, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशिंची अंमलबजावणी, आण्णाभाऊ साठे महामंडळाचा थकीत निधी देऊन पूर्ण क्षमतेने चालू करणे तसेच स्व. संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देणे या मागण्यासाठी समाज आग्रही असून या मागण्या मान्य झाल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही हे मुसळधार पावसातसुद्धा हजारोंच्या संख्येने असलेल्या उपस्थितीवरून शासन आणि प्रशासनाच्या लक्षात समाजाणे आणून दिले.
या आंदोलनाला भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुनील कांबळे, आमदार नामदेव ससाणे, अमित गोरके यांनी तर शिवसेना (उबाठा ) सचिन अहिर, भास्कर जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस च्या वतीने आमदार सुभाष धोटे, आमदार राजू आवळे, आमदार जितेश अंतापूरकर मा. सुरेशचंद्र राजहंस (प्रवक्ते ) रवींद्र दळवी (केंद्रीय निरीक्षक )यांनी सभेला उपस्थिती दर्शविली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाचे निवेदन मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वीकारले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी सकल मातंग समाजाचे  चंद्रपूर येथील राज्यसमन्वयक डॉ अंकुश गोतावळे आणि विविध भागातील  राज्य समन्वयक विष्णुभाऊ कसबे, सचिनभाऊ साठे, प्रा. संजय गायकवाड, मारोती वाडेकर, ऍड राम चव्हाण, कैलास डाखोरे, मधुकर साठे, बाबुराव मुखेडकर, एस एस धुपे, पंडित सूर्यवंशी, राजाभाई सूर्यवंशी, रणधीर कांबळे, गणपत भिसे, जोशीलाताई लोमटे, सुरेश पाटोळे,अशोक लोखंडे, भास्कर नेटके,।सुरेश साळवे,अशोक आल्हाट, रमेश रोकडे, अडागळे, प्रा डॉ. मच्छिन्द्र सकटे, प्रा डॉ मिलिंद आव्हाड, तात्या गालफाडे,प्रा चिमोरे, प्रा देवनाळे, प्रा. भालेराव, प्रा. मस्के, अवचार, दावलवार यांनी अथक परिश्रम घेतले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये