ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. कांशीरामजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या बसपाची चैत्यभूमी मुंबई येथे संविधान जागरण रॅलीचे समापन

बसपाने विधानसभा निवडणुकीत कसली कंबर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संविधान जन-जागरण रैलीच्या द्वारे बहुजन समाजाला एकत्र गुंफण्याचा आटोकाट प्रयत्न

नागपूर,भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असून भारतीय संविधानावर व आरक्षणावर होणाऱ्या मनुवादी षडयंत्र व आघाती निकाल संदर्भात राज्यात जनतेचा मनात उलट सुलट चर्चा होत आहे. अशा वेळी बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने संविधान व आरक्षण मागील बहुजन महापुरुषांची भूमिका तसेच आपलं शत्रुपक्ष व मित्रपक्ष समजून सांगण्यासाठी संपूर्ण राज्यात निराशाचे वातावरण दुर करुन बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या वतीने दिक्षाभुमी नागपूर ला 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर पर्यंत चैत्यभूमी रैली”दीक्षाभूमी ते चैत्यभूमी राज्यस्तरीय संविधान जन-जागरण रॅलीचे समापन धारावी मुंबई येथे जंगी-जाहिर सभा द्वारे संपूर्ण राज्यातून संविधान प्रेमी व संविधानाचे पुरस्कर्ते बहुजन समाजाला एकत्रित करून राज्य सरकार समोर आव्हान उभे करणार आहे.

या रॅली चे जाहीर सभेत रूपांतरण झाल्यानंतर या सभेचे संमेलन अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे कॉर्डिनेटर खासदार मा.डॉ. अशोक सिद्धार्थ साहेब,बसपा प्रदेशाध्यक्ष एड. सुनील जी डोंगरे उपाध्यक्ष संतोष शिंदे बसपा महासचिव डॉ.मोहन राईकवार हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व संविधान प्रेमी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमी मुंबई येथे संघटित एकत्रित होऊन धारावी मुंबई येथे होणाऱ्या जंगी- जाहीर सभे मध्ये लाखो च्या संख्येने सम्मिलित होऊन या मनुवादी सरकारविरुद्ध आपल्या हक्कासाठी न भूतो न भविष्य एकत्र व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड.सुनील डोंगरे साहेब यांनी केले आहे. हि संविधान जन-जागरण रॅली दिनांक 30 सप्टेंबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक ला अभिवादन करून राज्याच्या 24 जिल्ह्यात मार्गक्रमन करून मतदारसंघात लोकांना जनजागृती करत करत मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृती दिनी 9 आक्टोंबर ला मुंबई च्या चैत्यभूमीवर पोहोचून बाबासाहेबांच्या चैत्याला अभिवादन केल्यावर धारावी परिसरात या रॅलीचा समारोप होईल.

वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वर्धा जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शी भैसारे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील भगत,जिल्हा महासचिव मनोज माहोरे,जिल्हा प्रभारी सुदेश जवादे, प्रा.अजयकुमार घंगारे, कवडूजी मेश्राम,महिला अध्यक्षा मंदाताई नाखले यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये