ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत भारत कृषक समाजाकडून केंद्रीय कृषीमंत्र्यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, त्यांच्या समस्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचे नियोजन याबाबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांना भारत कृषक समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर, उपाध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांनी दिल्ली येथे निवेदन दिले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या थांबवण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले.

ज्यात संपूर्ण कर्जमाफी, एमएसपीमध्ये वाढ, भावांतर योजना, शेती अवजारे, खते, बियाणे, औषधे इत्यादींवर जीएसटी लावणे थांबवावे किंवा दिलेला जीएसटी शेतकऱ्यांना परत करावा, सरकारने पीक विमा योजना स्वतः चालवावी, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांच्या शेतात राबवावी. त्याचप्रमाणे दरवर्षी सरकार वेगवेगळे धान्य खरेदी करते आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि शेतकऱ्यांनाही त्रास दिला जातो, म्हणून ही योजना बंद करावी आणि त्याऐवजी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फरक देण्यात यावा.

दरवर्षी गोदामे, बारदाने लागतात. तसेच या योजनेसाठी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची पण आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे याबाबत कृषीमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये