ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बारावीच्या विद्यार्थ्याना निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 1 फेब्रू रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षे संबंधित मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी एम सी वी सी विभागप्रमुख प्रा आरजु आगलावे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा नंदा भोयर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा नरेंद्र हेपट मनोगत श्री सुधीर थीपे आभार प्रा सचिन भैसारे यांनी मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.