नगर विकास विभागात मुख्याधिकारी म्हणून एकाच नगरपरिषदेत जास्त सेवा देणारे अरुण मोकळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्य शासनाच्या अधिनस्त विविध विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना एका ठिकाणी किती काळ सेवा द्यावी याची यापूर्वीच नियमावली राज्य सरकारकडे तयार आहे.
यामध्ये वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकारी वर्गाला एका ठिकाणी कमीत कमी दोन वर्ष व जास्तीत जास्त तीन वर्षे सेवा देता येते, अपवादात्मक स्थितीत शासन प्रशासकीय कारण देत कोणत्याही अधिकाऱ्याची केव्हाही बदली करू शकते, श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत अरुण मोकळ नावाचं वादळ हे मुख्याधिकारी पदाचं कवच घेऊन दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी दाखल झालं B.SC.संगणक सोबतच MBA चे शिक्षण चांगल्याप्रकारे घेतलेल्या मोकळ साहेबांनी शहराचा सखोल अभ्यास केला कोणत्या व्यक्तीची कुठपर्यंत मजल आहे याचा सुद्धा अभ्यास केला व हे करत असताना शहराच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे लक्ष देऊन अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे विकासाचे आराखडे तयार करून झपाट्याने विकास कामे करावयास सुरुवात केली अठरा पगड जाती धर्मातील नागरिकांना त्यांनी सोबत घेतल्याने अल्पावधीतच ते नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले राजकीय लोकांपेक्षा या अधिकाऱ्यांचे सगळीकडे गुणगान सुरू झाले त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय या नगर परिषद मध्ये त्यांनी प्रशासक पदाची सूत्रे हातात घेतली व या विभागाचे आजी-माजी लोकप्रतीनिधी यांच्यासोबत समन्वय साधत शहराच्या विकासासाठी त्यांनी जवळपास 400 कोटी रुपये मंजूर करून आणले व प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात केली त्यांची या कार्यालयातील सेवा 7 सप्टेंबर.24 रोजी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होणार असे नागरिकांना वाटू लागले.
मात्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागात आपल्या कामाने आगळावेगळा ठसा उमटवल्याने शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांच्यावर मेहरबान होत त्यांची बदली न करता दिनांक 30 मे 25 रोजी त्यांना याच पदावर डिसेंबर 25 पर्यंत कायम राहण्याचे आदेश पारित केले नगर विकास विभागाचे इतिहासातील ही पहिलीच घटना अशी आहे की एका मुख्याधिकाऱ्यास एकाच ठिकाणी सतत चार वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देण्याचा मान मिळाला व या श्रींच्या पुण्यनगरीतील नगर परिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने याची नोंद घेण्यासारखी ही घटना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना निवडून दिलेले नगराध्यक्ष व नगरसेवक हे जास्त काम करू शकतात की प्रशासक हे या ठिकाणच्या झालेल्या विकास कामावरून लक्षात येते. देऊळगाव राजा नगर परिषद स्थापनेनंतर सर्वात जास्त काळ मुख्याधिकारी म्हणून सेवा देणारे हे अरूण मोकळ नावाच वादळ ठरलं एवढे माञ नक्की