ताज्या घडामोडी

पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन

साईप्रकाश कला अकादमीचा अनोखा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             स्थानिक साईप्रकाश बहुउद्देशीय कला व शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

     पत्रलेखनाचा विषय ‘माझे आवडते शिक्षक, शिक्षिका किंवा गुरु’ मग ते कुठल्याही क्षेत्रातले व विषयांचे असो. या विषयावर आपल्या आवडत्या शिक्षकांस उद्देशून पत्र स्वहस्ताक्षरात लिहावे व ते खालील दिलेल्या पत्त्यावर दिनांक २५ मे २०२५ पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावे. शब्द मर्यादा १०० ते २०० असावी. आंतरदेशीय पत्र अथवा कोऱ्या कागदावर लिहून लिफाफा बंद करून पोस्ट करावे. ही स्पर्धा निशुल्क असून त्यातील निवडक पत्रांना पारितोषिक दिल्या जाईल व शालिक दानव याच्या आगामी साहित्यकृती मध्ये प्रकाशित केल्या जाईल.

पत्ता – शालिक दानव, बगडे वाडी, बंगाली कँम्प रोड, भद्रावती.

क्षितीज शिवरकर, स्नेहल नगर, अली पेट्रोल पंप मागे, भद्रावती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये