नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्गचा अंतिम टप्पा कधी सुरू होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सध्या नागपुर ते इगतपुरी पावतो च्या 625 किलोमिटर अंतरावर समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरू आहे, इगतपुरी तेआमने/ मुंबई /पावतो च्या 76 किलोमिटर च्याअंतिम टप्पा चे काम पुर्ण झाले आहे, मार्च मध्ये अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे सांगीतले जाते आहे.
येत्या 1 एप्रिल पासून टोल मध्ये वाढ होणार आहे, तत्पूर्वी अंतीम टप्प्या वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे,नागपुर ते मुंबई पावतो चा 701 किलोमिटर चा महामार्ग हा देशातील सर्वाधिक अत्याधुनिक एक्स्प्रेस वें ठरणार आहे, कसारा घाटातून 8 किलोमिटर लांबीचा बोगदा अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून कऱण्यात आला आहे, समृद्धी महामार्गावर एकून 6 लेन असुन रुंदी 120 मीटर आहे, चार चाकी वाहनमधून 150 किलोमिटर प्रती तास वेगाने प्रवास करताना नागपुर ते मुंबई पावतो चा प्रवास केवळ 8 तासात करता येईल त्यामूळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे,तेव्हा समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे, अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागपूर ते मुंबई थेट प्रवास कमी वेळात पुर्ण करता येईल.
समृध्दी महामार्गावरील वाहतूक सध्या मोठया प्रमाणात सुरू आहे. अपघात ची मालिका सुरूच आहे, वाहन चालकांना विश्रांती घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत त्यामूळे चालकाला डुलकी येऊन अपघात होत असल्याचे दिसून येत आहे, वाहनांची तपासणी आर टी ओ मार्फत होताना दिसत नाही, त्यामूळे सुद्धा अपघात होत आहे, तेव्हा अपघाताची मालिका थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.