वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार
सावली वनपरिक्षेत्रातील महिन्याभरातील तिसरी घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
नरभक्ष वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी
सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बीट अंतर्गत मुल तालुक्यातील चितेगाव येथे आज पुन्हा एकदा वाघाने हल्ला केल्याने शेषराव नागोसे वय ३५ या युवा शेतकऱ्याचा बळी गेला असून या परिसरात महिन्यात घडलेली तिसरी घटना असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.
चितेगांव येथील रहिवासी शेषराव नागोसे हा आपल्या वडिलासोबत शेतात पिकाला पाणी देत असतांना वाघाने हल्ला केला व परपटत नेत शरीरापासून डोके वेगळा करीत ठार केले. या परिसरात महिन्याभरात निलेश कोरेवार, मल्ला येगावार या दोन मेंढपाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने वाघास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले मात्र हुलकवणी दिल्याने फिंजऱ्यात आलाच नाही.
वाघाने हल्ला सावली वनपरीक्षेत्रात केलेला असून मृतदेह चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील मूल बीटात आढललेला आहे.आज तिसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून नरभक्ष वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.