ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवारमध्ये राज्यात बुलढाणा जिल्हा अव्वल येण्यासाठी काम करावे : डॉ. किरण पाटील

ज्या संस्थेने कार्यारंभ आदेश घेऊनही काम सुरू केलेले नाही अशा संस्थेतील कामे दोन एप्रिल रोजी काढून इतर संस्थांना देणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे

संस्थेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रमुखांनी सहकार्य करण्याचे निर्देश

 संपूर्ण राज्यात “गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार” योजनेअंतर्गत विविध लहान मोठ्या धरणातील गाळ काढण्याचे कामास युद्ध पातळीवर सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेडे तांडे वाड्या या पाणीटंचाई मुक्त व्हावे.

अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची असून त्यांनी पुढील पाच वर्षासाठी राज्यातील विविध धरणातील गाळ काढण्यासाठी अर्थसंकल्पात फार मोठी तरतूद करून ठेवली असून गाळ काढण्याचे काम सतत सुरू राहणार असल्याचे सांगून याबाबत शासनाने ऑक्टोबर 24 मध्येच निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात 109 धरणातील गाळ काढण्यासाठीचे कामाचे प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे दालनात दिनांक 18 मार्च 25 रोजी संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थिताना त्यांनी सांगितले की गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल यावयास हवा राज्यात सर्वात जास्त काम आपल्या जिल्ह्यात आपल्याला करायचे आहे.

असे निर्देश या प्रसंगी त्यांनी देऊन ज्या ज्या खाजगी संस्थेला गाळ काढण्याचे आदेश मृद व जलसंधारन विभागाकडून देण्यात आलेले आहे त्या सर्व संस्थांनी तात्काळ कामात सुरुवात करावी एक एप्रिल पर्यंत गाळ काढण्याचे कामस सुरुवात न झाल्यास त्या संस्थेला दिलेले आदेश रद्द करून इतर संस्थेला ते काम करण्याचे आदेश देण्यात येईल याचबरोबर ज्या ज्या संस्थेला ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या संबंधित यंत्रणा प्रमुखांनी त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे व वनविभागाने त्यांच्या जमिनीमध्ये जे काही छोटे मोठे कट्टे असतील त्यातील गाळ काढून त्याच परिसरात टाकावा व त्या कट्ट्याची सिंचन क्षमता वाढवावी मुक्या जनावरांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार कामाचा आढावा घेण्यासाठी महिन्यातून दोन वेळेस आढावा बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले.

तर बीजेएसने याचा प्रचार प्रसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या कृषी विभागाने त्यांच्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करून त्यास प्रशासकीय मानता घेण्याचे सुचवण्यात आले बैठकीमध्ये संबंधित यंत्रणा प्रमुख बी जे एस चे पदाधिकारी एनजीओ चे पदाधिकारी विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये