ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगावराजा शहरवासीयांना होळीच्या निमित्ताने मिळाली “कुटुंब रंगलय काव्यात”ची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरात 1997 पासून सतत जायंट्स परिवाराच्या वतीने होळी उत्सवानिमित्त दरवर्षी हास्य कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीही दिनांक 14 मार्च 2025, गुरुवार रोजी जायंट्स परिवाराच्या वतीने होळीच्या निमित्ताने मुंबईचे प्रसिद्ध कवी विसुभाऊ बापट यांचा “कुटुंब रंगलय काव्यात” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम परमपूज्य धोंडीराज महाराज मंदिराच्या शेजारील मैदानात पार पडला आणि देऊळगावराजाच्या रसिकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला.

विसुभाऊ बापट यांनी आजवर 10,000 हून अधिक कविता, 2700 पेक्षा जास्त काव्यप्रस्तुती, 70 पेक्षा जास्त काव्यविधा आणि 10 हून अधिक मराठी बोली भाषांमध्ये आपली कला सादर केली आहे. त्यांची खासियत म्हणजे सलग 45 तासांपर्यंत काव्यपाठ आणि सजीव सादरीकरण. या त्यांच्या विश्वविक्रमी एकल काव्य-नाट्य प्रस्तुती “कुटुंब रंगलय काव्यात” च्या माध्यमातून त्यांनी आपली अनोखी कला सादर केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी वेगवेगळ्या शैलीत काव्यसादरीकरण केले. यात संस्कृती, कला, देशभक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. आपले प्रदेशातील कार्यक्रमाबद्दलही त्यांनी माहिती दिली परदेशामध्ये नेहमी पाऊस पडतो म्हणून रेन रेन गो अशी कविता शिकविले जाते पण आपल्याकडे पावसाची आवश्यकता असतानाही आपण रेन रेन गो चे अंधानुकरण करतो आहे.

यावर त्यांनी बोट ठेवले तसेच वऱ्हाड प्रांतातील अनेक कवींची उदाहरणे व त्यांच्या कविता त्यांनी सादर केल्या त्याचबरोबर सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांची” काळ्या मातीत मातीत तिफन चालते” ही कविता गाऊन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली तसेच खानदेशातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची “आधी हाताने चटके मग मिळते भाकर” ही कविता त्यांनी गाऊन अहिराणी बरोबर इतर भाषेतील गीतेही सादर केले याच गीतांनी बहिणाबाईंचे नाव उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाला मिळाले व त्या महान कवयित्री अजरामर झाल्या, अशाप्रकारे त्यांनी बहिणाबाईंची महती सांगितली, शहरी व ग्रामीण भागातील कौटुंबिक व सामाजिक उदाहरणे देऊन त्यांनी प्रेक्षकांना महिला वर्गाला मंत्रमुग्ध केले,

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक पत्रयोगी अशोक जोशी यांनी केले. याप्रसंगी बुलढाण्याचे बी जे एस चे अध्यक्ष राजेश देशलहरा व adv जितेंद्र कोठारी यांनी कवी विसुभाऊ बापट यांचा सत्कार केला.

शहरातील रसिक प्रेक्षकांनी या कविसंमेलनाचा मनसोक्त आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष कल्याण चांडगे,सन्मती जैन, पुरुषोत्तम धन्नावत, जुगलकिशोर हरकूट, संजय डोणगावकर , मनिष काबरा, डॉ. अशोक काबरा आणि इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये