ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट आदिवासी संतप्त कुसूंबी चूनखड्डी वाहतुक बंद पाडून केला निषेध    

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

         चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी येथील आदिवासी कोलाम समाजाच्या भूमापन मोजणी व जमिनीचा ताबा द्या यासाठी गेल्या चार महिन्यापासून आदिवासी कोलाम कंपनीच्या शंकर मूर्ती जवळ ठिय्या मांडून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधत आहे मात्र गेल्या चार महिन्यापासून आंदोलन सुरू असताना याकडे महसूल प्रशासन डोकावून देखील पाहिलेला नाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अधिवाशाचे शोषण होत असल्याचा आरोप सातत्याने सुरू असताना महसूल अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून या प्रकरणाला पडदा झाकण्याचं काम करीत असल्याचा अधिवाशामध्ये रोष आहे.

तीन महिन्यापूर्वी भीमा पगु मळावी व चुन्नू मुक्का आत्राम यांच्या जमिनीचे बांबेझरी शिवारातील भूमापन विभागाने मोजणी करून खदानीच्या सीमा क्षेत्राच्या आत या शेतकऱ्यांच्या जमिनी असून ताबा देण्यात यावा यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे दोनदा निवेदन देऊन लक्ष वेधले मात्र सदर निवेदनावर साधा मौक पंचनामा देखील करण्यात आला नाही व ताबा प्रक्रिया देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त आदिवासी कोलाम यांनी आज या आंदोलनावरून थेट वाहतूक बंद पाडली व हापरमध्ये महिला पुरुष जाऊन काम बंद पाडले यामुळे पोलिसां व आंदोलन कर्त्यामध्ये संघर्ष बाचाबाची झाली मात्र महसूल प्रशासन व कंपनी प्रशासन सदर जबाबदारी पोलीस प्रचारावर सोडून निष्ठुरपणाने निश्चिंत बघ्याची भूमिका घेतली आहे.

यामुळे आदिवासी कोलामांच्या गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरू असून प्रदूषण जमीन हडपने अधिवाशाचे शोषण करणे अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे धूळ खात पडले आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अवलोकन केले व याबाबत उपविभागीय अधिकारी राजुरा यांना तक्रारी संबंधात सात दिवसात अहवाल मागितला परंतु एक महिना होऊन सुद्धा अजून पर्यंत अनुसूचित जमाती आयोगाला अहवाल देण्याची तत्परता महसूल प्रशासनाने दाखविले नाही अखेर आजच्याआंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलन करण्याची समाज काढण्याचा प्रयत्न केला व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ घटना घडली.

मात्र आंदोलन कर्त्यांनी 27 मार्चपर्यंत आमच्या प्रकरणाचा निपटारा शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला याबाबत निर्णय झाल्यास 28 मार्चला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कार्यकर्ते भाऊराव कनाके रामकिसन आत्मा भीमा पगु मिळावी चिन्नुमुका आत्राम यांनी दिला आहे व दिनांक 27 ला गोपालपूर थुट्रा चांदूर येथील शेतकरी कंपनीने जमिनीचे सुपीकता नष्ट करून प्रदूषणामुळे धुळीच्या अति धूळ सोडणे यामुळे शेतीतील कापूस सोयाबीन तूर मिरची या पिकाला फटका बसून उत्पादन घट झाले या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असल्याने या शिवारातील 30 ते 35 शेतकऱ्यांना हेक्टरी 52 हजार दोनशे रुपये मोबदला देण्यात यावा यासाठी ठिय्या आंदोलन व कंपनीची सिमेंट वाहतूक बंद पाडण्याचा इशारा जन सत्याग्रह संघटनेचे आबिद अली यांनी दिला आहे सिमेंट उद्योगाच्या प्रदूषणामुळे कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती नष्ट होत असल्याने कंपनी जबाबदार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे कठोर कारवाई करत नसल्यामुळे कंपन्याची मुजोरीचा परिणाम शेतकऱ्याच्या जिवारी लागला आहे याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व आदिवासी कोलामांचा होणारे शोषण थांबवावे अशी मागणी जोर पकडत करत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये