महिलांचा- महिलांसाठी- महिलांतर्फे सन्मान भगिनींचा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
८ मार्च १९०८ ला अमेरिकेतील न्यूयार्क मधून सुरु झालेल्या महिला आंदोलना नंतर संपूर्ण जगाने स्विकारलेला ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच जागतिक महिला दिनानिमित्ताने नागपूर मध्ये पहिल्यांदाच अ.भा. मराठा महासंघाच्या नागपूर जिल्हा व नागपूर शहर महिला कार्यकारीनीतर्फेआयोजित मराठा महिलांचा- महिलांसाठी महिलांतर्फे सन्मान भगिनींचा हा कार्यक्रम भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्रजी कोंढरे यांच्या नेतृत्वात व नागपूर विभागाचे अध्यक्ष मा. नरेन्द्रभाऊ मोहिते मार्गदर्शनात सरस्वती कल्याण मूक बधिर सभागृह, तुळशीबाग रोड, रेशीमबाग नागपूर येथे
श्रीमंत राणीसाहेब सौ. यशोधराराजे मुधोजीराजे भोंसले याच्या अध्यक्षतेत भरदुपारी असंख्य महिलांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. यावेळी
डॉ. सौ. निलम दिपक देशमुख (उपप्राचार्य व विभाग प्रमुख प्रियदर्शनी भगवती इंजिनिअरींग कॉलेज नागपूर
प्रा. निताताई जाधव (प्राचार्या – राजेंद्र हायस्कूल, महाल नागपूर)
सौ. वर्षा संजयराव घाडगे (जिल्हाध्यक्षा – नागपूर जिल्हा मराठा महिला महासंघ)
यांच्यासह कार्यक्रमाला शेकडो महिला भगिनी व माता उपस्थित होत्या..
यावेळी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती, छत्रपतींचे घराणे व इतर महापुरुषांबद्दल अपनामजनक शब्द वापरणाऱ्या कोरटकरचा यावेळी निषेध करण्यात आला.
समाजात अनेक संकटांवर मात करून, येणाऱ्या अडचणीचा सामना करत संसाराचा गाढा चालविणाऱ्या महिला आहेत. परंतु आधुनिक दुनियेच्या या लख्ख प्रकाशात पडद्याआड असलेल्या त्या गरीब, कर्तबगार, अशिक्षित व गरजवंत महिला समाजाकडून दुर्लक्षितच राहिल्या. तर दुसरीकडे *नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपण असे काम करायचे का ? लोकं काय म्हणतील अशा खोट्या, बिनकामाच्या व पुरातन विचारसरणीमुळे मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहिल्या, मागे राहिल्या.समाजात व्यवसाय, उद्योग व शिक्षण प्रशिक्षणाचे कार्य करीत असलेल्या या महिलांपासून गरजवंत इतर महिलांना प्रेरणा मिळावी, जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीला दूर करून परिवारासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हावी याकरिता अशा कर्तबगार, कष्टकरी, गरजवंत महिलांना मानपत्र देऊन त्यांचा गौरविण्यात आले. यांच्या कार्याला सलाम करून याच मायमाऊलींना मानाचा मुजरा करण्यात आला. यामध्ये कळमेश्वर-नागपूर-कळमेश्वर टेम्पो चालवत फळभाज्या खरेदी करून कळमेश्वर येथे फळभाजीचा व्यवसाय करणाऱ्या सौ. नंदा प्रमोद बेलेकर,अपघात झाल्यावरही न घाबरता, न डगमगता कुरड्या, पापडं, शेवळ्या, दिवाळीचा फराळ इ. विविध खाद्य पदार्थ तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या सौ. मंगला प्रभाकरराव पवार. मुकी बहिरी व निरक्षर असून चार घरी धुनी भांडी स्वयंपाक करत येणाऱ्या मिळकतीची काही रक्कम गरजवंतांच्या शिक्षणासाठी खर्च करणाऱ्या श्रीमती वच्छला गिरी.
बसच व फॅशन डिझायनर चे शिक्षण घेऊन घरी बसण्यापेक्षा कुटुंबाला हातभार लावणाऱ्या रसाळ वडापाव च्या सौ. अनुजा आलोक रसाळ.कुटुंबातील भांडणे, नवरा बायकोच्या नात्यांमधिल दुरावा, व्यसनामुळे घरात होणारी मारझोड, एकाशी लग्न व दुसऱ्याशी संबंध, मुला मुलींचे प्रेमप्रकरणे इत्यादी अनेक कारणामुळे १००० च्या जवळपास पोलीस केसेसमध्ये पोलीस मित्र किंवा शांतता समिती सदस्य म्हणून मदतकार्य करणाऱ्या वयाची सत्तरी ओलांडलेल्या श्रीमती लताताई आंभोरे. वयाची ६० वर्ष पार आल्यावरही प्रौढ वयाच्या ऑलंपीक स्पर्धेत १०००, २०००, ५००० मीटर दौड करून विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या शशिकला माने.
घरातील गरिबी वर मात कशी करावी, काही रोजगार नाही अशावेळी सन, समारंभ, उत्सव, प्रसंगी हार व बेल फुले विकणाऱ्या सुनंदा शंकरराव निंबाळकर. रोजच्या त्रासाला कंटाळून मुलांच्या भविष्यासाठी मुला मुलींना घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेत घरोघरी जाऊन गॅस शेगडी दुरुस्त करणाऱ्या श्रीमती अर्चना मोहिते. कोणताही मोबदला न घेता विविध ठिकाणी शेकडो महिला पुरुषांना योगा चे प्रशिक्षण देऊन सुदृढ आरोग्यासाठी सामाजिक जबाबदारी निभावणाऱ्या स्वाती करंभे महात्मे क्लिनिक मध्ये नोकरी करून घरी शेवया व इतर पदार्थ करून उपजीविकेला हातभार लावणाऱ्या मेघा सतिश गायकवाड घरची परिस्थिती बेताची असल्याने ४ घरी स्वयंपाक व शिवणकाम करून मुलीला शिकवणाऱ्या मंदा रवी लेंडे इत्यादीना मानपत्र व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मोबाईलच्या गैरवापरामुळे विद्यार्थी शाळेत न येता इतरत्र फिरत असतात, बगीच्यात अथवा निर्जन ठिकाणी शाळेतील मुले मुली आजकाल बिनधास्त दिसतात. कोणी काहीच बोलत नसल्याने, प्रशासना कडून कारवाईच होतं नसल्याने कोणाचाही धाक उरलेला नाही. यामुळे सामाजिक व कौटुंबिक जिवन धोक्यात येत आहे. गूड तोच व बाद तोच बाबत आई वडील व पालकांनी मुलींना मार्गदर्शन करण्याची, मुलींच्या विविध समस्या व वागणुकीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत प्राचार्य निता जाधव मॅडम यांनी मांडले.आजकाल मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आई वडील व शिक्षक पन जबाबदार असतात. आजकाल नियम व कायद्यांमुळे विद्यार्थ्यांना जास्त बोलता येत नाही. परंतू शिक्षणाच्या माध्यमातूनच मुलींना चांगले वाईट समजून सांगता येते. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेत जिवनातली प्रगती साधवी असे विचार यावेळी प्रियदर्शनी भगवती इंजिनिअरींग कॉलेजच्या उपप्राचार्य, विभागप्रमुख व प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. निलमाताई देशमुख यांनी व्यक्त केले.
आपल्या देशाला अनेक थोर महिलांचा इतिहास लाभलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचे योगदान आपल्याला आई म्हणून शिकण्यासारखे आहे, आज मराठा महासंघाने ज्या महिलांना याठिकाणी पुरस्कृत केले आहे त्यांच्या कार्यातून आपल्याला बरीच प्रेरणा मिळू शकते. ज्यांना आता सन्मानित करण्यात आले त्या महिला जर जगण्याचा मार्ग शोधू शकतात तर मग आपण का नाही. यालात्याला दोष देण्यापेक्षा आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी आपणच आपले मार्ग शोधावे. अशा कार्याला आमचा सदैव पाठिंबा असल्याचे आश्वासन यावेळी अध्यक्षीय भाषणात श्रीमंत राणीसाहेब सौ. यशोधराराजे मुधोजीराजे भोंसले यांनी मराठा महासंघाच्या महिलांना दिले.
मराठा समाजातर्फे महिला दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतं असून मराठा महासंघाने याकरीता पुढाकार घेतला त्याबद्दलअभिनंदन, असाच कार्यक्रम पुढच्या वर्षीचा कार्यक्रम भव्य स्वरूपात घ्यावा त्याकरीता आम्ही तनमनधनाने सहकार्य करू असा शब्द अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत कार्य केलेल्या देविदासजी किरपाने यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला.
माझा मुलगा तसा नाही, माझी मुलगी तशी नाही असे म्हणणाऱ्या महिलांनी मुला मुलींच्या मोबाईल वापरण्यावर लक्ष ठेवावे, शाळा, ट्युशन व फिरण्याच्या नावाने कुठे जातात याचा मागोवा घेत रहावा, उद्या रडत बसण्यापेक्षा आजच सावध झालेले बरे.कोणत्याही गटात, पक्षात, संघटनेत राहून पदाची लालसा न बाळगता समाजासाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या समस्त माता भगिनींना आमचा सलाम व मानाचा मुजरा आहे. असे विचार व्यक्त करून *मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील याचे सुपुत्र उपाध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्रजी कोंढरे यांच्या नेतृत्वातील मराठा महासंघाचे सदस्य होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी नागपूर विभागीय अध्यक्ष नरेन्द्र मोहिते यांनी केले.
मराठा महिला महासंघाच्या पुढील कार्याची माहिती यावेळी महिला जिल्हाध्यक्षा वर्षा घाडगे यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. कार्यक्रमाचे संचालन सुनिता गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार वृषाली चौधरी यांनी मानले. सौ विना शिंदे यांनी उत्तम गीत सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ मनिषा मोहिते, वंदना घाडगे, इंदुबाई गायकवाड वंदना शेळके, रिता मोहिते, यांनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमाला मनोहरराव कबले, दिपकराव देशमुख, मोहन जाधव, संजय घाडगे, आलोक रसाळ, अमित सवडे, प्रकाशराव धवने, गुणवंतराव धुरड, मनोज निकम, विराज घाडगे यांचेसह शशीकला किरपाने, मोना कबले, सुधा जाधव, गिता शिंदे, आशा जगताप, पल्लवी जाधव, स्वाती साळुंके, पुष्पा रोवते, अर्चना इंगळे, संचाली मोहिते, आरती वाघमारे, कुमुदिनी जाधव, श्रीमती सिमाताई भोसले, गिरीजा शिवणकर, चंदाताई कमलाकर, तृषाली चौधरी, रिता साळुंके, संध्या पालकर, इंदू डोंगरवार,शिवानी गायकवाड, मंगला चव्हाण, सुनंदा निंबाळकर, सपना जाधव, विद्या वानखेडे, सारिका कळसुळे, सिमा महाडीक, तृप्ती जाधव, सोनाली घाडगे, मनिषा जाधव, मंदा लेंडे, जयश्री सावंत,मेघा गायकवाड, कविता भांडवलकर, स्वाती मोहिते, ज्योती महाडीक, शिल्पा खांडे, आरती पवार, अश्विनी कावळे, संध्या शेळके, रजनी पवार, जोत्सना सावंत, रिता साळुंके, मेघा पालवे, स्वाती मामुलकर, कांचन चवळे, रागिणी मोहिते, दिपाली तावरे कविता शेंद्रे, इत्यादी शेकडो महिला उपस्थित होत्या.