ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयो शिबिरातून विद्यार्थी बोलके झाले पाहिजे – माजी आ. धोटे

निमणी येथे रासेयो शिबिराचे थाटात उद्घाटन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात चौफेर शिकायला मिळते विद्यार्थ्यांनी याचं संधीचा फायदा घेत भाषणकला अवगत करून घेत बोलके झाले पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर व ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथे रासेयो शिबिरात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

     यावेळी उद्घाटक म्हणून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राचार्य डॉ. अनिल चिताडे तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव थिपे, माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, प्राचार्य शैलेंद्र देव सरपंच अतुल धोटे,माजी उपरपंच उमेश राजूरकर, उपसरपंच शिल्पाताई जगताप, ग्रामसेवक सुभाष साऱये,संजय राळे ,जनार्धन झाडे, रमेश भोंगळे, गजानन गोबाडे, अशोक झाडे, भालचंद्र कोंगरे, प्रफुल काळे,अनिल कारेकर आदी उपस्थित होते

उद्घाटनीय भाषणात डॉ अनिल चिताडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे व्हावे व आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन या भरकटलेल्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रखर मेहनत करून उतुंग व्यक्तिमत्त्व घडवावे असे आवाहन केले

कार्यक्रमांचे संचालन कू संजना कोसरे कू अष्टमी मुंडे यानी केलें तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा चेतन वानखेडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ अनिस खान, प्रा पवन चाटारे, प्रा रामृष्ण पटले, प्रा मनोहर बांदरे,डॉ अजय कुमार शर्मा, डॉ संदीप घोडीले ,प्रा चेतन वैद्य, डॉ उत्कर्ष मुन, कु शबाना शेख, सुभाष गोरे,शुभकांत शेरकी, प्रशिक करमनकर, संजय पिंपळकर,सुयोग खोब्रागडे,यशवंत मांडवकर, भास्कर मेश्राम,अरुण मेंढी, रमेश मांडवकर, रुपेश मेश्राम,शिवशंकर दुबे, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व स्वयंसेवक गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये