वरुड गावातील अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे मिळावे
याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वरुड गावातील अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना तीन महिन्यापूर्वी धरणे आंदोलन करून निवेदन दिले होते. वर्धा शहरालगतची बारा ते तेरा गावे एकत्रित करून महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत.
याकरिता वरुड ग्रामपंचायतीने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होण्याकरिता ठराव घेऊन विरोध दर्शविला होता. हे गावे ग्रामपंचायत मधून महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यास ग्रामपंचायत ची कर आकारणी पाणीपुरवठा इत्यादीत वाढ होईल ते सर्वसाधारण नागरिकांना परवडण्याजोगे नाही.,
यासोबतच ईव्हीएम मशीन प्रक्रिया न राबवता बॅलेट पेपरवर संभाव्य निवडणुका व्हावा याकरिता वरुड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनकर मारोतराव आंबुलकर यांचे मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी वरुड, म्हसाळा गावातील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते.