बौध्दगया मुक्ती करिता सावलीत शांतता मोर्चा
महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
बिहार राज्यातील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वात सावली तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवाच्या पुढाकाराणे (दि.3) रोजी दु. 2 वाजता रमाबाई आंबेडकर विद्यालयातून तहसील कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
रखरखत्या उन्हात या शांतता मोर्चात शेकडोच्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते, आम्हाला आमचे पवित्र स्थळ परत करा, प्रधानमंत्री होष मे आओ अशा घोषणा या शांतता मोर्चात देण्यात आल्या.
बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनहीं झाले. आता भारतीय भिक्खू संघाने १२ फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि १९४९ चा बीटी कायदा रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन सावलीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना देण्यात आले.
मोर्च्याचे यशस्वीते करिता गोपाल रायपूरे, किशोर उंदीरवाडे, शंकर दुधे, आशिष गेडाम, उल्काताई गेडाम, विलास महोरकर, अनिकेत गोडबोले, रोशन बोरकर, अंतबोध बोरकर, चेतन मोटघरे,पवन मेश्राम, तसेच समता सैनिक दलाचे सर्व सदस्य आदींनी प्रयत्न केले.