Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिवती तालुक्यातील सिंचन तलाव अडकले वनविभागाच्या कचाट्यात !

दहा वर्षांनंतरही सिंचन तलावाची कामे थंडबस्त्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- मराठवाड्यात सन १९६० ते ६५ दरम्यान भीषण दुष्काळ पडल्यानंतर लातूर, नांदेड, परभणी, बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो नागरिक स्थलांतरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडावरील डोंगरदऱ्यात वसलेल्या जिवती तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले. म्हणून जीवतीला ‘मिनी मराठवाडा’ आहे असे म्हटले जाते. दोन पिढ्या निघून गेल्या आता तिसरी पिढी हे पाहाडावरील डोंगर पोखरून जमिनीत शेतीपासून आजही येथील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावरच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र अद्याप पर्यंत येथे सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी कुणीही राजकीय पुढारी व शासन, प्रशासन पुढे आले नाही जिवती ,गुडशेला व कोदेपूर येथील लघु सिंचन तलावाच्या कामाला २०१४- १५ मध्ये सुरुवात झाल्याने माणिकगड पहाडावरील काही भागातील शेतीसाठी सिंचनाचे सोय होऊन पिकासाठी वरदान ठरणार असे वाटले होते. मात्र तालुक्यातील संपूर्ण जमीनच वन विभागाची असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्याने त्या कामांना ब्रेक लागला व लघु सिंचन तलावाला ग्रहण लागले तेव्हापासून लघु सिंचन तलावासाठी जमिनी अधिग्रहण केलेले शेतकरी कैचीत व या धोरणात सापडले असून शेती गेली आणि त्यांना मोबदला मिळाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला मात्र आश्वासना शिवाय पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे तलावांचा प्रश्न कायमच प्रलंबित राहिलेला आहे.

 तलाव झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा

जलसंधारण व वन विभागाने जातीने लक्ष घातल्यास तालुक्यातील प्रलंबित तीन लघु सिंचन तलावाचा मार्ग मोकळा होईल व परिसरातील शेतकऱ्यांना पिकाच्या सिंचनासाठी सोय होऊन पीक उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांची उन्नती होईल उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. शिवाय राना,वनातील व जंगलातील पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होईल

प्रस्ताव शासन दरबारी अडकला

वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत जिवती गुडसेला व कोदेपूर येथील लघु सिंचन तलावाच्या बांधकामा करिता संबंधित विभागाने २८ सप्टेंबर २०२० ला वन जमीन वळतीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव वन विभागात पाठविला. मात्र वन विभागाने प्रस्तावित वनक्षेत्राच्या बदल्यात पर्यायी वनीकरणाकरता महसूल विभागाच्या ताब्यातील वन्यत्तर रोप वना योग्य जमीन उपलब्ध करून प्रस्ताव मार्गी लावण्याचे ते काम करायचे नसल्यास तसे स्पष्ट कळवावे. असे पत्र उपवनसंरक्षक मध्ये चांदा वन विभाग चंद्रपूर यांनी १९ जुलै २०२३ ला मृद व जलसंधारण उपविभाग राजुरा यांना पाठविले आहे या दोन्ही विभागाच्या कैचीत लघु सिंचन तलावाची कामे अडकले आहेत.

शेतकऱ्यांच्या नशीबी सिंचनाची निराशाच!

कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे पहाडावरील शेतकरी पुर्णता खचला आहे.निसर्गाच्या भरोश्यावर कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळत नाही.यंदाही निसर्गाने साथ दिली नाही.शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळाला नाही.त्यामुळे हतबल झालेल्या शेकडो शेतकरी रब्बी हंगामाकडे वळली मात्र तिथेही तलावाच्या पाण्याची साथ मिळाली नाही.पिक येण्याआधीच करपली गेली अशा विविध कारणांनी पहाडावरील शेतकरी खचला जातो.त्यांना सावरण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रशासनाने या क्षेञात सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी बंधारे,तलाव,व छोठे मोठे बांध तयार करून जमिनीत पाण्याची पातळी वाढविल्यास नक्कीच पहाडावरील शेती सुजलाम सुफलाम होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये