ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांच्या बदल्यामुळे जिवतीत शिक्षणाचा खेळखंडोबा!

आकांक्षीत जिवती तालुक्यातील प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुका हा नक्षलग्रस्त, डोंगराळ, दुर्गम,आदिवासी बहुलक्षेत्र असून हा तालुका शासनाने आकांक्षी तालुका म्हणून जिल्ह्यातून एकाच तालुक्याची निवड झालेली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक जॉन्सन,शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनवणे,उपविभागीय अधिकारी माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके, समाज कल्याण अधिकारी पेंदाम,तहसीलदार शेंबटवाड, गटविकास अधिकारी भिंगारदिवे,व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका,शिक्षक सर्व विभागाचे कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समक्ष तहसील कार्यालयात मोठा गाजावाजा करून आकांक्षी तालुका झाल्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न केला.

आकांक्षी तालुक्यात आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास, पिण्याचे पाणी, स्वच्छता,आर्थिक समावेश, व इतर अन्य घटकांना न्याय देऊन या तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी अधिकाऱ्यांनी मोठी भाषने, व घोषणा या ठिकाणी दिल्या आणि यातील शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुक्यात नियोजन करून आखणी करून शैक्षणिक दर वाढवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर आठच दिवसात अत्यंत मोठ्या चलाखीने प्रशासनाकडे सद्यस्थितीत मोठे अधिकार असल्याने गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार असल्याने कोणतीही कल्पना होऊ देता तालुक्यातील बारा शिक्षकांच्या बदल्या करून जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये या शाळेतील संकेत हुमणे चिखली खुर्द, दीक्षा कांबळे टेकामांडवा, निकतखान चिखली बुद्रुक, पूजा चिलबुले जिवती, प्रांजली करडपूजे शेनगाव, निखिल मांडवकर दमपूर मोहदा, अनिरुद्ध शिवणकर नंदपा, रोहन खुणे मरकागोंदी, रजत चोले सेवादासनगर, सरोज ठेंगरे कोलांडी, हिमांशू कांबळे पिट्ठीगुडा २, प्रफुल्ल ठेंगेकर येल्लापूर या बारा गणित, इंग्रजी विज्ञान या विषयाचे शिक्षकांना जिल्ह्यातील १४ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात आली.

परंतु या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नेल्यास येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी गणित,विज्ञान हे कठीण विषय कोण शिकवणार? येथील विद्यार्थी हे हुशार झाले पाहिजे नाहीत का? मग या विद्यार्थ्यांना शिक्षण नको का? या विद्यार्थ्यांवर असा अन्याय का? असा संतप्त सवाल येथील पालक करीत आहेत. कठीण असलेले विषय सोपे करून शिकविण्यासाठी तज्ञ शिक्षक तालुक्यातील काढून जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद शाळांना देण्याचे नेमकं प्रयोजन? मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना काय योग्य वाटले ?आणि येथील शिक्षकांना या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊ नये का? असा सवाल तालुक्यातील सर्व स्तरातून पालकातून होऊ लागलेत तेव्हा बाराही शिक्षक इथून प्रतिनियुक्तीने दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी शिक्षक येणे नाही?त्यांचा पगार येथील कार्यालयातील आस्थापनेतून होतो. आणि मग ती जागा तसेच खाली राहते. असा साधा विषय असताना अत्यंत जोखीमने व शांततेने हा आदेश काढून जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे.

असा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती सुग्रीव गोतावळे, दत्ता गायकवाड, सुमनबाई शेळके, संतोष आडे, विजय गोतावळे, प्रेम चव्हाण, विनोद पवार, सुदाम राठोड, संतोष थाडगे,शबिर भाई यांनी या बाबतचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केले आहे. सात दिवसाच्या आत शिक्षकांची भरती तात्काळ न केल्यास सर्व पालकांच्या वतीने पंचायत समितीला कुलूप ठोकण्यात येईल? असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे? यावर प्रशासन काय निर्णय घेईल याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये