Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

फेरीलँड शाळेचे दोन विद्यार्थी राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या अंतिम फेरीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         भद्रावती येथील फेरीलँड स्कूल च्या दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे दिनांक 11 रोज बुधवार ला आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असून ते या स्पर्धेसाठी दिल्लीला रवाने झालेले आहे. शाळेतील अनिकेत गुप्ता, इयत्ता ८ व आयुरा सिंग, इयत्ता 7 असे हे दोन यशस्वी विद्यार्थी आहेत.एस.चांद या कंपनीकडून दरवर्षी सदर राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धेच्या प्रथम दोन फेऱ्यांमध्ये देशातील 52 शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

या दोन फेऱ्यांमधून देशातील एकूण 8 शाळेतील प्रत्येकी दोन,अशा सोळा विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. यात फेरीलँड शाळेच्या या दोन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या यशामुळे अनिकेत आणि आयुरा यांनी केवळ फेरीलँड शाळेचेच नव्हे तर भद्रावती शहराचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक अड. युवराज धानोरकर, मुख्याध्यापिका वर्षा धानोरकर व शाळेतील शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये