चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी: ‘सैन्य दलाची दुसरी फळी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना होय. देशाच्या संरक्षण दलाकरिता तयार होत असलेले छात्र सैनिक समाजसेवेकरता तत्पर असतात. ‘देश प्रथम’ या ब्रीदवाक्यप्रमाने कार्यरत असलेल्या 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस.एस. एन.जे. महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी समय सुचकता दर्शवून वर्धा-देवळी महामार्गावर अपघात झालेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबल ला वाचवून पुढील अनर्थ टाळला.
सविस्तर वृत्त असे की स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या एनसीसी ग्राउंड समोर वाहत असलेल्या महामार्गावरून एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आपल्या स्कुटीने वर्धेवरून देवळीकडे जात होत्या तेव्हा त्यांची स्कुटी रस्त्यावर पडून असलेल्या चूरी व रेतीवरून घसरली व त्या खाली पडल्या. भरधाव रस्ता असल्यामुळे वाहनांची रेलचेल भरपूर आहे. यावेळी एनसीसी छात्र सैनिक ग्राउंड वर परेड करत असताना त्यांना सदर अपघात दिसला. समय सूचकता ठेवून तत्परतेने एनसीसी छात्र सैनिक अपघात स्थळी धावून गेले व त्यांनी सदर महिला पोलीस कॉन्स्टेबल ला वाचवले. त्यांच्या हाता पायाला भरपूर मार लागल्यामुळे त्यांना देवळीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांचा उपचार केला. सदर घटनेबाबत देवळी पोलीस स्टेशनला माहित झाल्यावर पोलीस रुग्णालयात पोहोचले व छात्र सैनिकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
सदर पोलीस महिलेला अपघातातून वाचविण्याकरता एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर ऑफिसर आदर्श नाईक, सार्जंट मनोज नेहारे, तेजस धोटे, अर्पित पोराटे, कांचन राऊत, खुशी पेटकर व श्रुती गुढे यांनी पुढाकार घेऊन यशस्वी प्रयत्न केले. सदर एनसीसी छात्र सैनिकांच्या समय सुचकतेबाबत सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.