ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय लोक अदालतीत 2138 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

6 कोटी 36 लक्ष 20 हजार रुपये तडजोड मूल्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2 हजार 138 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य 6 कोटी 36 लक्ष 20 हजार 119 इतके आहे.

 न्यायालयामध्ये प्रलंबीत असलेले प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदलतीचा मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका व जिल्हा न्यायाधिश -1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.ए.एस.एम. अली यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.

अदालतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-5 जे. ए. पेडगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन जे.ए.पेडगावकर यांनी केले.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.

            वर्धा जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी 1 हजार 262 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम 4 कोटी 73 लाख 59 हजार 139 रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 876 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रककरणामधील तडजोडीचे मुल्य 1 कोटी 62 लाख 60 हजार 980 इतके होते.

            न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण 2 हजार 138 इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य 6 कोटी 36लाख 20 हजार 119 इतके आहे.

            तसेच लोक अदालतीमध्ये विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली कौटूंबिक हिंसाचाराच्या 10 प्रकरणामधे पती पन्ती मध्ये असलेले वाद या लोकअदलातीमध्ये निपटारा करण्यात यश प्राप्त झाले असून त्यातील 2 कुटूंबाने हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये