देऊळगाव राजा येथे जीव मुठीत धरून त्यांनी रात्री जागून काढल्या
संततधार पावसामुळे घरात शिरले होते पाणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगर परिषदेच्या मार्फत शासनाच्या विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा शेकडो लोकांना लाभ दिला आहे. कोविडनंतर अनेकांनी जुने घर पाडून नवे घर बांधले आहे. तरीही शहरातील जुन्या, धोकादायक व पडायला आलेल्या इमारतींमध्ये पावसाळ्यातही काही कुटुंब राहत असल्याचे समोर आले आहे. अशा कुटुंबांना देऊळगाव राजा नगरपालिकेने नोटिसा ही बजावल्या आहेत. परंतु त्याची दखल काही प्रमाणात सदर घर मालक घेताना दिसून येत नाही. पालिका प्रशासनाने केलेल्या स्ट्रक्चर सर्वे मध्ये ही बाब समोर आली आहे. गत महिन्यात झालेल्या सतत धार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तर काहींच्या घरांच्या भिंती पडल्या. अशा घरातील लोकांनी जीव मुठीत धरून रात्री जागून काढल्या आहेत. शहरातील श्री बालाजी मंदिरात जाणाऱ्या वेशी पासून पुढे पुरातन वास्तूचे बांधकाम शेकडो वर्षांपूर्वी बांधकाम झालेले आहे. तशाच प्रकारचे शहरातील जुना जालना रोड परिसर, दुर्गापुरा भागाचा काही परिसरात जुन्या वास्तूचे तसेच कालबाह्य झालेल्या वास्तूचे बांधकाम आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी घरांच्या भिंती ची सुद्धा पडझड होते तर काही चांगल्या स्थितीत आहे.परंतु काही ठिकाणचे बांधकाम हे झालेल्या कालावधीमुळे जीर्ण स्वरूपाचे झालेले आहे त्या ठिकाणी काही वास्तूचे मालका कडून नूतन बांधकाम करताना दिसून येत आहे
शेकडो कुटुंबांना त्या घरकुलाचा लाभ
देऊळगाव राजा शहरात शासनाच्या घरकूल योजनेचे अनुदान अनेक लोकांना देण्यात आले आहे. जुने व धोकादायक इमारती पाहून अनेक नागरिकांनी नवीन बांधकाम केले आहे. तरी काही धोकादायक इमारती आहेत त्यांना नगर परिषदेच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत.
काल बाह्य झालेल्या इमारतींना दिल्या नोटीसा-
शहरातील श्री बालाजी मंदिर वेशीपासून पुढे जाणाऱ्या प्रभागापर्यंत अनेक वास्तूंचे बांधकाम हे कालबाह्य झालेले आहे हे संबंधित घर मालकांना सुद्धा माहित आहे. काहीजण सदर घराचे नूतनीकरण करत आहे तर काही ठिकाणी जुनी वास्तू पाडून नवीन वास्तूचे बांधकाम करताना दिसून येत आहे. पुरातन काळी झालेल्या बांधकामामुळे या ठिकाणी अरुंद प्रकारचे रस्ते ठेवण्यात आलेले आहे यामध्ये शहरातील दुर्गापुरा प्रभागातील काही भाग आणि इतर परिसरातील भाग येतो या ठिकाणी चार चाकी वाहन सुद्धा जात नाही पुरातन वास्तू असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी कोणतेही विकास कामे करताना मोठी कसरत करावी लागते.
*धोकादायक सात इमारतींत राहतात दहा कुटुंब* :
देऊळगाव राजा शहरातील जुन्या भागात असलेल्या धोकादायक असलेल्या सात घर मालकांना नोटीस देण्यात आलेल्या आहे घरांमध्ये आठ ते दहा कुटुंब राहत असल्याची माहिती आहे.
इथून बाहेर पडू मग राहू कोठे?
जुने बांधकाम असल्यामुळे इतर ठिकाणी राहावे वाटत नाही. पावसाळ्यात गैरसोय होते, मात्र पावसाळ्यानंतर तेवढा त्रास होत नाही. तसेच बाहेर भाड्याने खोली करायची म्हणजे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न सुद्धा हे रहिवासी नागरिक करताना दिसून येत आहे
*परिषदेने दोनवेळा बजावल्या नोटिसा* :
धोकादायक इमारती असलेल्या लोकांना नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी नोटिसा देण्यात येतात परंतु त्याच्यावर अंमलबजावणी घरातील कुटुंब प्रमुख यांना करणे आवश्यक असते कारण पालिका प्रशासन त्यांच्या पुढे अनर्थ टाळावे हा प्रमुख उद्देश प्रशासनाचा असतो.
पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वे मध्ये काही घरांचे बांधकाम हे कालबाह्य ठरवलेले आहे प्रशासनाने त्या संदर्भात सूचना सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात होणारा अनर्थ टाळावा तसेच सूचना दिल्यानंतर सुद्धा पुढे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानी साठी संबंधित जबाबदार राहतील. याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असे
अरुण मोकळ
मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपालिका देऊळगाव राजा यांनी सांगितले आहे.