Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीच्या वादातून शिवीगाळ

जीवे मारण्याची धमकी ; 6आरोपीवर गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना तालुक्यांतील किन्ही पवार या गावात 26 ऑगस्ट ला सकाळी 9वाजता घडली

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी संदीप खरात व आरोपी विजय खरात व अन्य हे एकाच गावातील असुन आरोपी हे फिर्यादी याच्या घरी 26ऑगस्ट ला आले व फिर्यादी यास पाहताच शिवीगाळ केली व लोटपाट करुन तुला आमच्या शेताकडुन जावे लागते, तु कसा आमच्या शेताकडुन जातो तुला आम्ही आता पाहुन घेतो, तेव्हा आरोपी म्हणाला की, माझ्याकडे गाडी आहे, त्या गाडीने तुला एखादया दिवशी उडवीन देतो अशी धमकी दिली. घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विजय खरात, ज्ञानेश्र्वर खरात, रवी खरात, राजेन्द्र खरात, केशव वाघ, गणेश वाघ, सर्व रा पांग्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये