बल्लारपूरात चोरीचा घटनेत वाढ नवनियुक्त ठाणेदार चोरांना लगाम कसणार काय?
नवनियुक्त ठाणेदार चोरांना लगाम कसणार काय?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर – शहरात दिवसेंदिवस चोरी चा घटनेत वाढ झाली आहे चोरांना पोलिसांचा धाकच राहिला नाही मागचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख नवीन आले असताना धडाधड कारवाई करून चोरांचा व गुन्हेगार वृत्तीचाना लगाम कसण्यात यश मिळवला होता पण आता नवीन रुजू झालेले ठाणेदार सुनील गाडे येताच चोर सक्रिय झाले आणि दिवसाढवल्या चोरी करीत आहे. कॉलरी ग्राउंड समोरून एक दुचाकी चोरीला गेली, १५ ऑगस्ट रोजी गांधी चौक परिसरातून नास्ता करायला गेलेला युवकांची दुचाकी चोरांनी पळविली, वॉल कंपाऊंड चे गेटचा ताला तोडून आत ठेवलेली मोपेड चोरून नेल्याची घटना शिवाजी वॉर्ड येथे घडली.
या दुकानात 25-30 हजारचे कपडे आणि 3 हजाराची चोरी
शहरात चोरट्यानी धुमाकूळ माजउन ठेवला भाजी मार्केट परिसरामधील 21ऑगस्ट ला ब्रो कोडं मेन्स वियर,जुनेद किराणा, गजानन स्टील सेंटर दुकानाचे टाले तोडून चोरी व चोरी चा प्रयत्न केला गेला शहरात होत असलेल्या चोरी मुळे नागरिक अस्वस्त होऊन आपल्या घराचे, दुकानाचे रक्षण स्वतः करीत आहे. पोलीस प्रशासन गाढ झोपेचे सोंग धारण करून आहे. शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक सुनील गाडे मीडिया माध्यमातून सूचित केले की शहराला अवैध धंदे, चिडिमारी, झगडे खोर, धमकी देणारे, अवैध दारू भट्टीयांचा पासून भय मुक्त करावे.